शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

भालावलमध्ये दीड एकरात फुलविली लिलीची फुलशेती

By admin | Updated: April 17, 2016 23:57 IST

शिक्षित तरूणांनी पारंपरिक शेतीचे जोखड झुगारून आधुनिक शेती करत व्यावसायिकदृष्ट्या नवा पायंडा पाडला आहे

महेश चव्हाण --ओटवणे --साजेसं उष्ण-दमट हवामान, खडकाळ जमीन, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित, मुबलक पाणी व किफायतशीर व्यवसाय या सर्व बाबींचा समतोल लक्षात घेत सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथील अशोक धाकू परब यांनी तब्बल दीड एकरात ‘लिली’ शेती यशस्वीरित्या फुलविली आहे.याअगोदर फक्त घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांच्या नवनवीन शेती प्रयोगाच्या आख्यायिका ऐकू यायच्या. शेतीतील बदलते तंत्रज्ञान स्वीकारत व आधुनिक शेतीद्वारे तेथील शेतकऱ्यांनी सधनता प्राप्त केली होती. त्यामुळे शेती करायची ती घाटमाथ्यावरच्यांनीच, असे बोलले जायचे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन, पैसा आणि अनुभव याअभावी तळकोकणात शेतीविषयी बरीच अनास्था होती. मात्र, चालू दशकात ही अनास्था मोडीत निघाली आहे. आधुनिकतेमुळे शेतीला आज व्यवसायाचे स्वरुप आले आहे. शिक्षित तरूणांनी पारंपरिक शेतीचे जोखड झुगारून आधुनिक शेती करत व्यावसायिकदृष्ट्या नवा पायंडा पाडला आहे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भालावल येथील शेतकरी अशोक धाकू परब.वडिलोपार्जित माड-पोफळीच्या बागा, काजू कलमे आणि काही प्रमाणात भातशेती अशा परंपरागत शेतीबरोबर नाविन्यपूर्ण आधुनिक शेती करण्याचा मानस अशोक परब यांचा होता. जमीन खडकाळ असल्याने रोपे जगण्याची शाश्वती नसताना आणि त्यापेक्षाही कठीण मेहनत या दोहोंचा समन्वय साधण्यात त्यांना यश आले. वन्यप्राण्यांपासून सुरक्षिततेची हमी देणारी आणि कमी कालावधीत उत्पन्न देणारी ‘लिली’ फु लशेती त्यांनी निवडली.त्यासाठी त्यांनी थेट पुण्याहून लिलीची पाच हजार रोपे मागवली. दोन रोपांमध्ये किमान अडीच फूट अंतर राहील, अशा पध्दतीने दीड एकर जमिनीमध्ये पाच हजार रोपांची लागवड केली. फूटभर खड्ड्यात माती-शेणखत याचा वापर करून तो खड्डा भरावा लागतो. या पिकाला पाणीही जास्त लागते. पण सिंचन पध्दतीने नियोजन केल्यास पाणी कमी लागते. लिलीच्या रोपाची लागवड केल्यानंतर महिन्यातून एकदा अर्धा किलो शेणखत तसेच १५ दिवसांनी युरिया, गुळी खताचा थोडाफार मारा करावा लागतो. रोपट्याची झपाट्याने वाढ होण्यासाठी त्याच्या मुळाकडील भाग स्वच्छ असावा लागतो. थेट सूर्यप्रकाशाची म्हणजे उष्ण हवामानाची या पिकाला गरज असल्याने सावलीत ही झाडे खुरटतात.लागवडीनंतर तब्बल सहा महिन्यांनी अडीच फुटापर्यंत रोपटे उंची घेत उत्पादन द्यायला सुरूवात करते. एका झाडाला दरदिवशी १० ते १२ फुले येतात. १ किलो मागे ६० ते १०० रूपये असा हमीभाव या फुलांना मिळतो. स्थानिक बाजारपेठेत ६०, तर गोवा राज्यात या फुलांना किलोमागे १०० ते १२० रूपये हमीभाव ठरलेला आहे. सणासुदीच्या काळात या फुलाचे भाव गगनाला भिडतात. स्थानिक बाजारपेठेतच १०० रूपयांहून अधिक, तर मोठ्या शहरांमध्ये १५० ते २०० रूपयांपर्यंत भाव जातो.या शेतीमधून दिवसाला १२ ते १४ किलो एवढी फुले मिळतात. म्हणजे दिवसाकाठी सरासरी १ हजार रूपये धरल्यास वर्षाकाठी तब्बल ३ लाखाची उलाढाल लिली फुलशेतीमार्फत करता येते, असे परब यांनी सांगितले. लागवड एकदाच, उत्पादन कायमचे लिलीची शेती ही किफायतशीर शेती म्हणून ओळखली जाते. सुरूवातीला लागवडीसाठी अधिक खर्च येतो. त्यानंतर फक्त साफसफाई, देखरेख आणि खतांचा समप्रमाणात मारा करावा लागतो. कारण हे पीक तब्बल आठ वर्षे उत्पादन देते. त्यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत खर्च कमी आणि उत्पादन अधिक मिळते. वडिलोपार्जित शेतीची परंपरा असलेल्या अशोक परब यांनी नूतन लिली फु लशेती करताना अथक मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्यांना पत्नी अश्विनी परब, मुलगा राहुल, साईल व मुलगी राधिका यांचे मोलाचे सहकार्य लाभते.शिक्षणक्षेत्रात स्पर्धा वाढल्याने अनेक सुशिक्षित, पदवीधर युवक बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीचे प्रगत तंत्रज्ञान व आधुनिकता लक्षात घेऊन शेती केल्यास नोकरीच्या दहापट अधिक उत्पन्न युवक शेतीतून मिळवू शकतात.- अशोक परब लिली फुलशेती बागायतदार