शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

भालावलमध्ये दीड एकरात फुलविली लिलीची फुलशेती

By admin | Updated: April 17, 2016 23:57 IST

शिक्षित तरूणांनी पारंपरिक शेतीचे जोखड झुगारून आधुनिक शेती करत व्यावसायिकदृष्ट्या नवा पायंडा पाडला आहे

महेश चव्हाण --ओटवणे --साजेसं उष्ण-दमट हवामान, खडकाळ जमीन, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित, मुबलक पाणी व किफायतशीर व्यवसाय या सर्व बाबींचा समतोल लक्षात घेत सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथील अशोक धाकू परब यांनी तब्बल दीड एकरात ‘लिली’ शेती यशस्वीरित्या फुलविली आहे.याअगोदर फक्त घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांच्या नवनवीन शेती प्रयोगाच्या आख्यायिका ऐकू यायच्या. शेतीतील बदलते तंत्रज्ञान स्वीकारत व आधुनिक शेतीद्वारे तेथील शेतकऱ्यांनी सधनता प्राप्त केली होती. त्यामुळे शेती करायची ती घाटमाथ्यावरच्यांनीच, असे बोलले जायचे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन, पैसा आणि अनुभव याअभावी तळकोकणात शेतीविषयी बरीच अनास्था होती. मात्र, चालू दशकात ही अनास्था मोडीत निघाली आहे. आधुनिकतेमुळे शेतीला आज व्यवसायाचे स्वरुप आले आहे. शिक्षित तरूणांनी पारंपरिक शेतीचे जोखड झुगारून आधुनिक शेती करत व्यावसायिकदृष्ट्या नवा पायंडा पाडला आहे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भालावल येथील शेतकरी अशोक धाकू परब.वडिलोपार्जित माड-पोफळीच्या बागा, काजू कलमे आणि काही प्रमाणात भातशेती अशा परंपरागत शेतीबरोबर नाविन्यपूर्ण आधुनिक शेती करण्याचा मानस अशोक परब यांचा होता. जमीन खडकाळ असल्याने रोपे जगण्याची शाश्वती नसताना आणि त्यापेक्षाही कठीण मेहनत या दोहोंचा समन्वय साधण्यात त्यांना यश आले. वन्यप्राण्यांपासून सुरक्षिततेची हमी देणारी आणि कमी कालावधीत उत्पन्न देणारी ‘लिली’ फु लशेती त्यांनी निवडली.त्यासाठी त्यांनी थेट पुण्याहून लिलीची पाच हजार रोपे मागवली. दोन रोपांमध्ये किमान अडीच फूट अंतर राहील, अशा पध्दतीने दीड एकर जमिनीमध्ये पाच हजार रोपांची लागवड केली. फूटभर खड्ड्यात माती-शेणखत याचा वापर करून तो खड्डा भरावा लागतो. या पिकाला पाणीही जास्त लागते. पण सिंचन पध्दतीने नियोजन केल्यास पाणी कमी लागते. लिलीच्या रोपाची लागवड केल्यानंतर महिन्यातून एकदा अर्धा किलो शेणखत तसेच १५ दिवसांनी युरिया, गुळी खताचा थोडाफार मारा करावा लागतो. रोपट्याची झपाट्याने वाढ होण्यासाठी त्याच्या मुळाकडील भाग स्वच्छ असावा लागतो. थेट सूर्यप्रकाशाची म्हणजे उष्ण हवामानाची या पिकाला गरज असल्याने सावलीत ही झाडे खुरटतात.लागवडीनंतर तब्बल सहा महिन्यांनी अडीच फुटापर्यंत रोपटे उंची घेत उत्पादन द्यायला सुरूवात करते. एका झाडाला दरदिवशी १० ते १२ फुले येतात. १ किलो मागे ६० ते १०० रूपये असा हमीभाव या फुलांना मिळतो. स्थानिक बाजारपेठेत ६०, तर गोवा राज्यात या फुलांना किलोमागे १०० ते १२० रूपये हमीभाव ठरलेला आहे. सणासुदीच्या काळात या फुलाचे भाव गगनाला भिडतात. स्थानिक बाजारपेठेतच १०० रूपयांहून अधिक, तर मोठ्या शहरांमध्ये १५० ते २०० रूपयांपर्यंत भाव जातो.या शेतीमधून दिवसाला १२ ते १४ किलो एवढी फुले मिळतात. म्हणजे दिवसाकाठी सरासरी १ हजार रूपये धरल्यास वर्षाकाठी तब्बल ३ लाखाची उलाढाल लिली फुलशेतीमार्फत करता येते, असे परब यांनी सांगितले. लागवड एकदाच, उत्पादन कायमचे लिलीची शेती ही किफायतशीर शेती म्हणून ओळखली जाते. सुरूवातीला लागवडीसाठी अधिक खर्च येतो. त्यानंतर फक्त साफसफाई, देखरेख आणि खतांचा समप्रमाणात मारा करावा लागतो. कारण हे पीक तब्बल आठ वर्षे उत्पादन देते. त्यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत खर्च कमी आणि उत्पादन अधिक मिळते. वडिलोपार्जित शेतीची परंपरा असलेल्या अशोक परब यांनी नूतन लिली फु लशेती करताना अथक मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्यांना पत्नी अश्विनी परब, मुलगा राहुल, साईल व मुलगी राधिका यांचे मोलाचे सहकार्य लाभते.शिक्षणक्षेत्रात स्पर्धा वाढल्याने अनेक सुशिक्षित, पदवीधर युवक बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीचे प्रगत तंत्रज्ञान व आधुनिकता लक्षात घेऊन शेती केल्यास नोकरीच्या दहापट अधिक उत्पन्न युवक शेतीतून मिळवू शकतात.- अशोक परब लिली फुलशेती बागायतदार