शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

काेराेनाचा फायदा, शुभंकराेती पाठ अन् नमाजाचे पठण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या मुलांचे ऑनलाइन अध्ययन सुरू आहे. ऑनलाइन अध्ययनामुळे मुलांच्या हातात मोबाइल सहज उपलब्ध होत आहे. अध्ययनानंतरही ...

रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या मुलांचे ऑनलाइन अध्ययन सुरू आहे. ऑनलाइन अध्ययनामुळे मुलांच्या हातात मोबाइल सहज उपलब्ध होत आहे. अध्ययनानंतरही मुले जास्त वेळ मोबाइलमध्ये गुंतत आहेत. कोरोनामुळे धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थाही बंद आहेत; परंतु मुलांचे धार्मिक शिक्षण व्हावे, त्यांच्यावरील संस्कार घट्ट व्हावेत यासाठी पालकांची भूमिका आग्रही आहे. त्यामुळे कोरोना काळातही मुलांचे घरात धार्मिक शिक्षण सुरू आहे.

स्तोत्र पठणासह परवचासाठी काही पालक आग्रही आहेत. दररोज तिन्ही सांजेला पालक मुलांचे पाठांतर, अध्ययन करून घेत असल्याने मुलांचे धार्मिक शिक्षण सुलभ झाले आहे.

‘परवचा’मुळे पाठांतर

सहा वर्षांखालील मुलांचे उच्चार सुलभ व्हावेत यासाठी शुभंकरोती, विविध स्तोत्रांचे पाठांतर करून घेतले जाते. याशिवाय मराठीसह इंग्रजी महिने, आठवड्याचे वार, बाराखडी, पाढे पाठांतर घेतले जात आहे. एकूणच ‘परवचा’ दररोज म्हणून घेतली, तर पाठांतर सुलभ होऊन मुलांचे बाैद्धिकदृष्ट्या अध्ययनही सहज होत आहे.

उच्चार सुलभ

नमाज पठण असो, वा कुराण पठण करताना उच्चार सुलभ होणे आवश्यक आहे. शिवाय त्यासाठी पाठांतरही गरजेचे आहे. पाच वर्षांपासूनच्या मुलांना दिवसातून एखादा तास बसवून पाठांतर करून घेतले, तर अध्ययन सुलभ होते. कोरोनामुळे मुले घरी असल्याने धार्मिक शिक्षणासाठी मुलांना अवधी प्राप्त झाला आहे.

ताणतणावापासून संरक्षण

अभ्यासासाठी मोबाइल हातात आला असला तरी काही मुलांना मात्र मोबाइलचे जणू व्यसन लागले आहे. त्यामुळे पालक त्रस्त होत आहेत. विपश्यना सेंटरच्या माध्यमातून मुलांचे मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांना ध्यान शिकविले जाते. मुलांची एकाग्रता वाढते, तणाव कमी होण्यास मदत होते, मुलांचे अभ्यासाकडे पुन्हा लक्ष केंद्रित होत आहे.

पाठांतर आवश्यक

अभ्यासाबरोबर धार्मिक शिक्षणही गरजेचे आहे. स्तोत्र पाठांतराबरोबर उच्चार महत्त्वाचे आहेत. ठरावीक वयात पाठांतराची सवय असेल, तर उच्चार सुलभ होतात. त्यामुळे सध्या मुलांना वेळ असल्याने दररोज ठरावीक वेळेत पाठांतर करून घेतले, तर नक्कीच मुलांचे धार्मिक शिक्षण सुलभ होईल.

-अमित घनवटकर, गणपतीपुळे

वेळेचा सदुपयोग

नमाज, कुराण पठणाची विशिष्ट पद्धत आहे. शिवाय त्यामध्ये उच्चारही महत्त्वाचे आहेत; परंतु ते सुलभ व्हावे यासाठी मुलांनी त्याचे अध्ययन करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मुले घरी असल्याने सध्या पालक या शिक्षणासाठी विशेष आग्रही असून, मुलांकडून आग्रहाने करून घेत आहेत.

-मुफ्ती ताैफिक सारंग, रत्नागिरी

एकाग्रता वाढते

मोबाइल किंवा अन्य व्यवधानामुळे मुलांवरील ताण वाढतो, अशावेळी मुलांचे मनपरिवर्तन गरजेचे आहे. कोकण विपश्यना केंद्राच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन ‘ध्यान’ शिकविण्यात येते. यामुळे मुलांचे मोबाइलचे वेड कमी होऊन मनाची एकाग्रता वाढते, अभ्यासाकडे मुले केंद्रित होत आहेत.

-संतोष आयरे, विश्वस्त, कोकण विपश्यना केंद्र