शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

ही तर शिवसेनेच्या ऱ्हासाची सुरुवात : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

राजापूर : आपल्या भागातील भावी पिढीचा विकास व्हावा या ध्यासाने पछाडलेल्या आणि विकासाची कास धरलेल्या राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर ...

राजापूर : आपल्या भागातील भावी पिढीचा विकास व्हावा या ध्यासाने पछाडलेल्या आणि विकासाची कास धरलेल्या राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर यांसह या शेकडो शिवसैनिकांनी विकासाचा मारेकरी ठरलेल्या शिवसेनेचा त्याग करून भाजपमध्ये केलेला प्रवेश हा भविष्यातील शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात असल्याचा घणाघात भाजपाचे प्रदेश चिटणीस, रत्नागिरी जिल्हा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. यापुढे आता अनेकांचे असेच भाजपमध्ये पक्षप्रवेश होतील, असेही जठार यांनी सांगितले.

कोकणच्याच नव्हे तर देशाच्या विकासाला गती देणारा रिफायनरी प्रकल्प होणारच अशी गर्जना करतानाच भविष्यात ज्या साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची संमती पत्रे दिलेली आहेत त्या शेतकऱ्यांची लॅन्ड पुलिंग कायद्यांतर्गत कंपनी प्रस्थापित करून पुणे येथील मायग्रा प्रकल्पाच्या धर्तीवर रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देऊन इथल्या शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा आमचा निर्धार असल्याची घोषणाही जठार यांनी यावेळी केली.

राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात जठार बोलत होते. प्रमाेद जठार पुढे म्हणाले की, ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, तळागाळात शिवसेना वाढविली त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज शिवसेनेत किंमत नाही, कायमच भावनिक राजकारण करून शिवसेनेने निवडणुका जिंकल्या आहेत, पण आता कोकणातील जनता शहाणी झाली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आश्वासनाला आता ती बळी पडणार नाही, कारण तिनं आता आपला विकास आपणच करायचं ठरवलं, असे ते म्हणाले.

आपली नाही तर इतरांची चूल पेटली पाहिजे, भविष्यात माझ्या बेरोजागार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवून काजवे, आंबेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. निश्चितच त्यांच्या प्रयत्नांना फळ येणार नव्हे रिफायनरी राजापुरातच आणि तीही नाणार परिसरातच होणार, असेही जठार यांनी सांगितले. मायग्राच्या माध्यमातून जे पुण्यात होऊ शकते ते राजापुरातही होऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ. रिफायनरी प्रकल्प राजापुरातून घालवायला आम्ही देणार नाही, असेही जठार यांनी सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, अनिकेत पटवर्धन, अनिलकुमार करंगुटकर, महादेव गोठणकर, यशवंत वाकडे, डॉ. अमोल तेली, प्रवेशकर्ते राजा काजवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक विलास पेडणेकर, दीपक बेद्रे, सुहास मराठे, सुरज पेडणेकर, विजय कुबडे, अरविंद लांजेकर, आशिष मालवणकर, मोहन घुमे, शीतल पटेल, शिल्पा मराठे, पंकज गुरव, संदेश विचारे, रसिका कुशे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------------------

राजापुरातील पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रमोद जठार यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी अनिल करंगुटकर, रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव, डॉ. अमोल तेली, यशवंत वाकडे, अनिकेत पटवर्धन उपस्थित हाेते.