शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण, वाॅटर स्पोर्ट्साठी पसंती

By मेहरून नाकाडे | Updated: May 24, 2024 19:28 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी माैजमजा, शिवाय वाॅटर ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी माैजमजा, शिवाय वाॅटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटकांची पावले रत्नागिरी तालुक्यात वळत आहेत. तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, काजिरभाटी, आरे-वारे, मांडवी, भाट्ये, झरीविनायक, पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.श्रीक्षेत्र गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळेचे गणपती मंदिर ही प्रमुख देवस्थाने असून, या ठिकाणी भक्तांची गर्दी होते. समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्यामुळे भाविक धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत असतात. समुद्रस्नान हा आवडीचा भाग. याच्या जोडीला किनाऱ्यावर कुटुंबातील सदस्यांबरोबर खेळ रंगतात. त्याचबरोबर वाॅटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगचाही आस्वाद पर्यटक घेतात.

वाॅटर स्पोर्ट्साठी पसंती

समुद्रकिनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत समुद्रस्नानाचा आनंद घेतला जातो. पर्यटकांसाठी जलक्रीडांचे विविध प्रकार उपलब्ध असून, पर्यटक याचा आस्वाद घेतात. वाॅटर स्पोर्ट्सबरोबर स्कूबा ड्रायव्हिंगमध्ये समुद्राच्या अंतर्भागाचे साैंदर्य पाहता येते. पॅरासेलिंग, झीपलाईन मात्र धाडसी पर्यटक करू शकतात. मात्र, ते पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत असते.शांत किनाऱ्यांची निवडगणपतीपुळे, मांडवी, भाट्ये किनाऱ्यावर प्रचंड गर्दी असते. हल्ली आरेवारे, काजिरभाटी बिचेसवरही गर्दी वाढू लागली आहे. गर्दीमध्ये जाण्याचा कंटाळा करणाऱ्या पर्यटकांची पावले पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी समुद्राकडे वळू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकही वनडे पिकनिकसाठी या ठिकाणांची निवड करत आहेत. सुटी तसेच वीकेंडला या बिचेसवरही गजबज अधिक असते.

सुविधांची वानवा

जिल्ह्यात पर्यटनासाठी येणारा पर्यटक केवळ एक ठिकाण किंवा एका मंदिरात दर्शन घेत माघारी फिरत नाहीत. आसपासची मंदिरे, किनारे एकूणच प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातात. हल्ली समुद्रकिनाऱ्यांवर खाद्यपदार्थ विक्री, खेळणी विक्री, शहाळी विक्री, अंघोळीसाठी पाणी या व्यवसायांना सुगीचे दिवस आले आहेत. वास्तविक, संबंधित गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यटकांसाठी प्रशासनगृहे, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था किनाऱ्यांवर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष होत आहे.वन डे सहलसांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यांतून अनेक पर्यटक एक दिवसाच्या सहलीसाठी तालुक्यात येतात. पहाटे घराबाहेर पडतात. दिवसभरात जेवढ्या पर्यटनस्थळाला भेट देऊन सायंकाळी मागे फिरतात. एक दिवसाच्या सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. रिक्षा टेम्पो, जीप, कार, ट्रॅव्हलर याशिवाय दुचाकीने पर्यटक येत आहेत. हे पर्यटक निवासासाठी येत नसल्यामुळे लाॅजिंगची आवश्यकता भासत नाही. मात्र, नाष्टा, भोजन करतात. त्यामुळे या पर्यटकांकडूनही नुकसान नसले तरी फायदा सुद्धा नक्की नाही.

आंबा खरेदी

मधुर स्वाद, अविट गोडी या गुणधर्मांनी युक्त हापूसची भुरळ सर्वांनाच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या पर्यटकांकडून आंबा खरेदी आवर्जून केली जाते. महामार्गावरही विक्रीचे स्टाॅल उपलब्ध आहेत. आंब्यासह काजूगर, ओले काजू, फणस, करवंद, जांभळांचीही खरेदी केली जाते.रत्नागिरी तालुक्यात काय पाहाल?

  • श्रीक्षेत्र गणपतीपुळे
  • श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर, पावस
  • गणेशगुळे येथील गणपती मंदिर
  • रत्नदुर्ग किल्ला व श्री भगवती देवीचे मंदिर
  • श्री काळभैरव मंदिर, रत्नागिरी
  • थिबा राजवाडा
  • लोकमान्य टिळक जन्मस्थान
  • भाट्ये किनारा व झरीविनायक मंदिर
  • मांडवी किनारा
  • आरेवारे व काजिरभाटी समुद्रकिनारा
  • पूर्णगड, गावखडी बीच
  • छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा
  • श्री विठोबाचा पुतळा
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनSea Routeसागरी महामार्ग