शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शासनाची आर्थिक मदत मिळविताना फसगत होणार नाही, याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मदत घोषित केली आहे. मात्र, ही ...

रत्नागिरी : लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मदत घोषित केली आहे. मात्र, ही मदत मिळविताना यातून रिक्षा व्यावसायिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने ही मदत मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करू नये किंवा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तीकडे आपली महत्त्वपूर्ण कागदपत्रे देऊ नयेत, अशा इशारा रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा-टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जिल्हा उपसंघटक अविनाश कदम यांनी दिला आहे.

कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय ठप्प झाला आहे. मात्र, रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीची रक्कम परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांच्या थेट खात्यात जमा केली जाणार असून मदत मिळवून देतो, असे सांगून फसविण्याचे प्रकार होऊ शकतात.

सध्या शासन ऑटोरिक्षा चालकांना प्रत्यक्ष मदत कशी देता येईल, याबाबत विचार करीत असून त्यादृष्टीने सर्वेक्षण करीत आहे. जिल्हानिहाय परवानाधारकांच्या नावासह यादी तयार केली जात असून महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपापल्या जिल्ह्यातील परवानाधारक यांची नावासह माहिती घेऊन संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी हे राज्य परिवहन आयुक्त अर्थात शासनाचे प्रमुख सचिव यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करतील. त्यानंतर सरकार जिल्हानिहाय परवानाधारक यांची नावे जाहीर करील. त्यानंतर संबंधित ‘मदत वाटप कक्ष’ हे परवानाधारक यांचे ओळखपत्र , बँक खाते क्रमांक मागवून घेतील. त्यानंतर संबंधित रिक्षा व्यावसायिकाला १५०० रुपयांची आर्थिक मदत ही थेट परवानाधारकाच्या खात्यांवर टाकण्यात येणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.

मात्र, या प्रक्रियेबाबत आपल्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक संधीसाधू लोक मदत मिळवून देण्याचे नाटक करून फसवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे आपली व्यक्तिगत माहिती इतर कुणालाही देऊ नका. यातून स्वतःची आणि इतरांचीही फसगत होण्याचा धाेका असल्याचे अविनाश कदम यांनी स्पष्ट केले आहे.

परिवहन उपायुक्तांचीही सूचना

राज्यात काेरोनाच्या अनुषंगाने राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये सानुप्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. परंतु काही प्रतिनिधी-संघटना यांच्याकडून हाती फॉर्म भरून घेण्यात येत आहे, अशा तक्रारी या कार्यालयाकडे आल्या आहेत. परवानाधारक रिक्षा चालकांचे सानुग्रह अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. यासाठी कोणताही फॉर्म भरून देण्याची अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, असे परिपत्रक परिवहन उपायुक्त लक्ष्मण दराडे यांनीही मंगळवारी काढले आहे.