शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

कोरोना काळातही बँकेची सकारात्मक वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

राजापूर : कोरोना संकटकाळाची झळ जशी इतर क्षेत्रांना बसली तशी ती बँकींग क्षेत्रालाही बसली आहे; मात्र अशाही काळात राजापूर ...

राजापूर : कोरोना संकटकाळाची झळ जशी इतर क्षेत्रांना बसली तशी ती बँकींग क्षेत्रालाही बसली आहे; मात्र अशाही काळात राजापूर अर्बन बँकेने ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून आपली ध्येयधोरणे आखली. त्याचा सकारात्मक परिणामही प्रकर्षाने दिसून आला. या संकट काळातही बँकेचे ठेवीदार, कर्जदार सभासदांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळे बँकेला या संकटकाळात यशस्वी वाटचाल करणे सोपे झाले. बँकेने या आर्थिक वर्षात सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावले उचलतानाच एकूण प्रगतीत समाधानकारक वाटचाल केल्याचे बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्याचा विकास व बँकांच्या हितासाठी रिफायनरी प्रकल्प या तालुक्यात मार्गी लागला पाहिजे, या हेतूने बँकेने रिफायनरी व्हावी म्हणून तसा ठराव केल्याचेही ते म्हणाले.

भविष्यात हातिवले व भू येथे बँकेचे विस्तारित कक्ष सुरू करतानाच सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत आणण्यासाठी बँकेने पावले उचलली असून, लवकरच बँकेचे फिरते एटीएम सेंटर ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.

या आर्थिक वर्षात बँकेने एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखतानाच २ कोटी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ६३ कोटींची वाढ करत ३०८.५७ कोटींचा ठेवींचा टप्पा गाठला आहे. कर्जव्यवहारांमध्येही वाढ करताना १८७.४६ कोटी इतका कर्जपुरवठा करत ठेवी आणि कर्ज वितरणाचा चढता रेशो कायम राखला आहे. कोरोना संकटकाळातही बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांनी दाखविलेल्या दृढ विश्वासामुळेच बँकेने आपली ही यशस्वी घोडदौड कायम राखल्याचे बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी सांगितले.

राजापूर अर्बन बँकेच्या १०० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभुमीवर बुधवारी बँकेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अभ्यंकर व अहिरे यांनी बँकेच्या सन २०२०-२१ या वर्षातील प्रगतीबाबत बँकेच्या साधलेल्या प्रगतीची माहिती दिली. तर यावर्षीही १०० वी सर्वसाधारण सभा प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन पद्धतीने होत असल्याची माहिती दिली.

ग्राहकांना अत्याधुनिक सेवा पुरविताना सायबर सुरक्षिततेबाबतही अधिकाधिक खबरदारी घेतली जात आहे. २४ तास सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, संचालक हनिफ काझी, संजय ओगले, विजय पाध्ये, प्रसाद मोहकर, अनामिका जाधव, राजेंद्र कुशे, कर्मचारी प्रतिनिधी संचालक रमेश काळे, दिलीप दिवटे आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन व आभार बँकेचे एसडीओ प्रसन्न मालपेकर यांनी मानले.

...................

प्रकल्प आलेच पाहिजेत

राजापूर तालुक्यात औद्योगिक क्रांती होणे आवश्यक आहे, तरच भविष्यात बँकांनाही आर्थिक प्रगती साधणे अधिक शक्य होणार आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरीसारखा प्रकल्प झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका जयंत अभ्यंकर यांनी मांडली. वैयक्तिक मते वेगळी असू शकतात; मात्र एका बँकेचा अध्यक्ष या नात्याने विचार केला तर आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती यासाठी अशा प्रकल्पांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.