शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बाबासाहेबांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिनीच येते फक्त त्यांच्या मूळगावाची आठवण, मात्र नंतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 15:26 IST

महापरिनिर्वाण दिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आली की, साऱ्यांनाच बाबासाहेबांचे मूळगाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) गावाची आठवण हाेते. मात्र, या गावाच्या विकासासंदर्भात राज्यकर्त्यांची भूमिका वेळाेवेळी बदलत गेली आहे

प्रशांत सुर्वेमंडणगड : महापरिनिर्वाण दिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आली की, साऱ्यांनाच बाबासाहेबांचे मूळगाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) गावाची आठवण हाेते. मात्र, या गावाच्या विकासासंदर्भात राज्यकर्त्यांची भूमिका वेळाेवेळी बदलत गेली आहे. गेल्या ६५ वर्षांच्या अनास्थेची पुनरावृत्ती गेल्या पाच वर्षांत झाली आहे. राज्यकर्ता बदलले तरी आम्ही आहाेत तेथेच आहाेत, अशी भावना आता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन व आंबेडकर जयंती वेळी जगभरातून अनुयायी तसेच त्यांच्या विचारांना मानणारे लोक अभिवादन करण्यासाठी आंबडवे याठिकाणी येतात. महामानवाचे गाव असूनही हे गाव आजही अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहे. आंबडवे गावाला शासकीय, निमशासकीय, तसेच विविध संस्थांचे मोठमोठे पदाधिकारी भेट देतात. डाॅ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काहीतरी करावे या उद्देशाने माघारी फिरतात. मात्र, आजवर केवळ आश्वासनांपलीकडे काहीच झालेले नाही.

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यु.जी.सी. ग्रांट कमिशनच्या माध्यमातून देशातील मागास भागात उच्च व तंत्र शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने मॉडेल कॉलेजची निर्मिती झाली. २०१३ मध्ये महाविद्यालयाचे कामकाजास सुरू झाले. मात्र, गेल्या आठ वर्षांत या महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा उपलब्ध हाेऊ शकलेली नाही. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून केवळ बीबीएम व बीएससी (आय.टी.) हे दोनच शिक्षणक्रम महाविद्यालयात शिकविले जातात. महाविद्यालयाची इमारत अद्यापही बांधलेली नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या खोलीमध्ये सध्या महाविद्यालयाचे नैमित्तिक कामकाज सुरू आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह नाही. महाविद्यालय सुरू झाले असले तरी अपुऱ्या सोयीसुविधांमुळे या ठिकाणी अन्य तालुक्यांतून विद्यार्थी दाखल हाेत नाहीत.

रस्ते, वीज, औषधोपचार, बँक सुविधा, जेवण व्यवस्था, इंटरनेट यासारख्या अडचणी आजही या गावात कायम आहेत. आंबडवेच्या विकास आराखड्यात लोणंद ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्ग असून, याकरिता सुमारे ३५० कोटी रुपयांचे काम प्रस्तावित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाड-राजेवाडी रस्त्यांच्या कामाच्या प्रारंभाचे श्रीफळ वाढविले. मात्र, तीन वर्षांनंतरही कामाला सुरुवात झालेली नाही.

संसद ग्राम याेजना फसली

खासदार अमर साबळे यांनी विकासाच्या दृष्टीने आंबडवे गाव दत्तक घेतले होते. शासनाच्या विविध विभागांच्या सहभागाने कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. मात्र, गेल्या चार वर्षांत आराखड्यातील कोणतेही ठळक विकासकाम खासदारांना साधता आलेले नाही. त्यामुळे ही याेजना पुरती फसली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर