शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या प्रवासाची एसटीकडून सज्जता

By admin | Updated: August 29, 2014 23:08 IST

के.बी. देशमुख : ८१० गाड्यांचे आरक्षण

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर गावाकडे परतली आहेत. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी एस. टी.कडून सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत परतीच्या ८१० गाड्यांचे आरक्षण झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी यावेळी दिली. गणेशोत्सव म्हणजे सर्व सणांचा राजा. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. यावर्षी कोकणात १९१३ जादा गाड्या आल्या असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २१३ गाड्या अधिक आल्या आहेत. रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या आल्या आहेत. अवजड वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळला असला तरी गणपतीसाठी कोकणात खासगी कार, गाड्याने येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर गर्दी दिसूून येत आहे. एस. टी.ची वाहतूक मात्र नेहमीच्याच मार्गावरून सुरू आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून १९१३ जादा गाड्या प्रवाशांना घेऊन आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८१० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.दररोजच्या १५० गाड्यावगळता दि. ४ ते १० सप्टेंबरअखेर ८१० गाड्यांचे एस. टी. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. दि. ४ रोजी ८१, दि. ५ रोजी २००, दि. ६ रोजी २९०, दि. ७ रोजी १५०, दि. ८ रोजी ५०, दि. ९ रोजी ३०, दि.१० रोजी ९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. दि. ६ रोजी सर्वाधिक गाड्या मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. प्रत्येकाला तिकीट मिळण्याची सुविधा राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त मुंबईहून तसेच बाहेरून येणार, हे गृहित धरून एस. टी. प्रशासनाने भक्तांसाठी येणाऱ्या व परतीच्या गाड्यांचे चोख नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)