शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

कोरोना योद्ध्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनामुळे कोणाचे नातेवाईक दगावले तर कोणावर अचानकपणे बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...

कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनामुळे कोणाचे नातेवाईक दगावले तर कोणावर अचानकपणे बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सर्वच उद्योगधंदे बंद पडल्याने नोकऱ्या राहिलेल्या नाही. नोकरी असेल तर मानधन, वेतन मिळालेले नाही तर काही कर्मचाऱ्यांना अर्धवेतनावर काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत केवळ दोनवेळचे अन्न मिळाले तरी चालेल पण नोकरी टिकली पाहिजे म्हणून काही कामगार, कंत्राटी कर्मचारी नोकरी टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचा काही ठिकाणी गैरफायदाही घेण्यात आला. काही खासगी कंपन्यांमध्ये दोन-तीन महिन्यांचे मानधनच दिलेले नसल्याची ओरड सुरु आहे. काहींना अर्धमानधनावर समाधान मानावे लागत आहे. महामारी असल्याने आरोग्यसेवेमध्ये अनेक लोकांची आवश्यकता होती. कर्मचारी कमी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीमध्ये कोणीही काम करण्यास तयार नव्हते. मात्र, आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मागे-पुढे न पाहता शासनाच्या आवाहनानंतर कामाची जबाबदारी स्वीकारली. आजपर्यंत कंत्राटी कर्मचारी, कामगारांची ठेकेदारांकडून तसेच शासनाकडूनही थट्टाच झालेली आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन या कर्मचाऱ्यांनी काम न करता ते सुरुच ठेवले आहे.

बेरोजगारी इतकी आहे की एखाद्या ठिकाणी २ जागा भरावयाच्या असल्या तरी हजारो सुशिक्षित बेरोजगार रांगेत उभे असलेले चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे आज नोकऱ्या कमी असून, बेरोजगारी त्यापेक्षा कित्येक पटीने आहे, हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच काही खासगी कंपन्या, शासनाचे फावले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन कर्मचारी, कामगारांना राबवायचे काम केले जात आहेत. नोकरी न राहिल्यास खायचं काय, अशी चिंता रोजगार असलेल्यांना तर बेरोजगारांना नोकरी नसल्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे मिळालेली नोकरी टिकवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जगण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना प्रादुर्भावात नोकरी गमावणाऱ्यांची संख्या कमी नाही. ही संख्या वाढतच चालली आहे. बेरोजगारीमुळे काही लोकांनी आपले जीवनही संपवले होते. आज अनेकजण बेरोजगारीमुळे हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची फार भीषण परिस्थिती आहे. त्यांची जगण्यासाठी धडपड सुरु आहे. काही सुशिक्षित बेरोजगार नोकरी मिळवण्यासाठी खासगी, सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत तर लाखो बेरोजगार मिळेल ते काम स्वीकारत आहेत. एकूणच जगण्यासाठी धडपडण्यापलिकडे त्यांच्याकडे काहीही पर्याय राहिलेला नाही. एखाद्याने नवीन व्यवसाय उभा करावयाचा झाल्यास त्यातही अनेक अडचणी उभ्या राहतात.

राज्यातील हजारो कंत्राटी आरोग्यसेवक, डाटा एंट्री ऑपरेटर यांची सेवा अचानक, तडकाफडकी खंडित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय त्यांच्यावर मोठा आघातच होता. कोरोना कालावधीत आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या आरोग्यसेविकांना अचानक कमी करण्याचे फर्मान केंद्र शासनाकडून सर्वच जिल्ह्यांच्या आराेग्य विभागांना देण्यात आल्याने राज्यातील या कोरोना योद्ध्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तुटपुंज्या वेतनावर मागील १५ वर्षांपासून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कुटुंंब केंद्र शासनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे उघड्यावर पडणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी कोरोना कालावधीत अनेकांचे जीव वाचवले, आज त्यांच्याच जीवाशी शासन मोठा खेळ खेळत आहे, याला काय म्हणावे.