शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ६.१० मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात पाण्याचा टँकर उशिरा धावला. तसेच अजूनही पाणीटंचाईग्रस्तांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी आहे. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील, याचा अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून २०२१ मार्चच्या अखेरीस सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार मागील ५ वर्षातील सरासरी आकडेवारी ०.१४ मीटरने वाढली आहे. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी ६.१० मीटर आहे. भूजल पातळी व्यवस्थित असल्याने टंचाईची तीव्रता यंदा कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते.

भूजल पातळीची स्थिती चांगली असल्याने यंदा जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात सध्या १२ गावांतील १४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. या टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षापेक्षा यंदाची पाणीटंचाई निम्मी आहे.