शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महिलांचा पालिकेवर हल्लाबोल

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ... हे काम येत्या आठ दिवसांनंतर सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सध्या बोजवारा उडाला आहे. शहरातील काही भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सोमवारी रत्नागिरी पालिकेवर हल्लाबोल केला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पाणी सभापतीपदी आलेल्या स्मितल पावसकर यांना संतप्त महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या चार दिवसांपासून शहरातील झाडगाव भागात नळाला पाणीच आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मध्येच पाणीपुरवठा ठप्प होण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांची पाण्याची समस्या कधी सुटणार, असा सवाल येथील महिलांनी पाणी सभापती पावसकर यांना केला. झाडगावप्रमाणेच शहरातील खालची आळी येथील महिलांनीही पालिकेवर पाणीप्रश्नी धडक दिली. या दोन भागांचाच नव्हे; तर शहरातील अनेक भागांमधील ही वारंवार उद्भवणारी पाणीसमस्या असून, पालिकेच्या पाणी विभागाकडून मात्र तात्पुरती मलमपट्टी केली जाते व पुन्हा पाणीपुरवठा सुरू होतो. जागोजागी जलवाहिन्या गंजलेल्या असून फुटलेल्या आहेत. गटारातून आलेल्या जलवाहिन्याही फुटलेल्या असून, त्यातून सांडपाणीही अनेकदा नळातून येण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलावर्ग संतप्त झाला आहे. (प्रतिनिधी) शहर बाजारपेठ व खालची आळीसह अनेक ठिकाणी असलेला हा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी या भागाला साळवी स्टॉप येथून स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. जलवाहिनीचे हे काम येत्या आठ दिवसांनंतर सुरू केले जाईल, असे आश्वासन पाणी सभापती स्मितल पावसकर यांनी दिले. यावेळी सेनेचे नगरसेवक राहुल पंडित, शहर विकास आघाडीचे नगरसेवक दत्तात्रय तथा बाळू साळवी उपस्थित होते.