शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:46 IST

गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देथंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगारआतातरी कलमे मोहरण्याची अपेक्षा

रत्नागिरी : गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

पौष महिना सुरू झाला असून, पौष महिन्यात फळधारणा कमी होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचे सातत्य कायम राहून मोहोर प्रक्रिया सुरू झाली तर फळधारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवी नसलेल्या झाडांचे प्रमाण १५ ते २० टक्के होते. परंतु अवेळच्या पावसामुळे या झाडांनाही पालवी आली. मात्र, काही ठिकाणी मोहोर आला असला तरी हे प्रमाण अवघे १० टक्केच होते. या मोहोरावर सध्या थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. थ्रीप्सपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असून, उत्पादनापेक्षा खर्चच अधिक आहे.ऑक्टोबरमध्ये आलेली पालवी जून होत असून, थंडीमुळे पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. शिवाय कोवळ्या पालवीलादेखील अंकुर येण्याची शक्यता आहे. पालवीवर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुडतुड्यावर कीटकनाशक फवारणी करून नियंत्रणात आणला आहे. मात्र किडीमुळे शेतकरी हैराण असून, कृषी विभागदेखील या किडीबाबत साशंक आहे. शेतकरी बांधव कृषिसेवकांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करीत आहेत.पालवीवर किडींचा प्रादुर्भावअत्यल्प मोहोर असणाऱ्या झाडांना सध्या साबुदाणा, वाटाणा आकारातील फळधारणा झाली आहे. थंडी वाढली तर फळधारणा झालेल्या झाडांना पुनर्मोहोराचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे पीक सध्यातरी निसर्गावर अवलंबून आहे. विविध संकटातून वाचलेले पीक २० मार्चनंतर बाजारात येण्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाणही अत्यल्प असणार आहे.उत्पादन वाचविण्यासाठी खर्च अधिकगतवर्षी जानेवारीत ३० ते ४० टक्के मोहोर होता. यावर्षी जेमतेम १० टक्के आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बाजारात आला होता. यावर्षी मात्र आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता असून, गुढीपाडव्याचा मुहूर्त यावर्षी शेतकऱ्यांना साधणे अशक्य आहे. हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी