शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:46 IST

गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देथंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगारआतातरी कलमे मोहरण्याची अपेक्षा

रत्नागिरी : गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

पौष महिना सुरू झाला असून, पौष महिन्यात फळधारणा कमी होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचे सातत्य कायम राहून मोहोर प्रक्रिया सुरू झाली तर फळधारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवी नसलेल्या झाडांचे प्रमाण १५ ते २० टक्के होते. परंतु अवेळच्या पावसामुळे या झाडांनाही पालवी आली. मात्र, काही ठिकाणी मोहोर आला असला तरी हे प्रमाण अवघे १० टक्केच होते. या मोहोरावर सध्या थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. थ्रीप्सपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असून, उत्पादनापेक्षा खर्चच अधिक आहे.ऑक्टोबरमध्ये आलेली पालवी जून होत असून, थंडीमुळे पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. शिवाय कोवळ्या पालवीलादेखील अंकुर येण्याची शक्यता आहे. पालवीवर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुडतुड्यावर कीटकनाशक फवारणी करून नियंत्रणात आणला आहे. मात्र किडीमुळे शेतकरी हैराण असून, कृषी विभागदेखील या किडीबाबत साशंक आहे. शेतकरी बांधव कृषिसेवकांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करीत आहेत.पालवीवर किडींचा प्रादुर्भावअत्यल्प मोहोर असणाऱ्या झाडांना सध्या साबुदाणा, वाटाणा आकारातील फळधारणा झाली आहे. थंडी वाढली तर फळधारणा झालेल्या झाडांना पुनर्मोहोराचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे पीक सध्यातरी निसर्गावर अवलंबून आहे. विविध संकटातून वाचलेले पीक २० मार्चनंतर बाजारात येण्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाणही अत्यल्प असणार आहे.उत्पादन वाचविण्यासाठी खर्च अधिकगतवर्षी जानेवारीत ३० ते ४० टक्के मोहोर होता. यावर्षी जेमतेम १० टक्के आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बाजारात आला होता. यावर्षी मात्र आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता असून, गुढीपाडव्याचा मुहूर्त यावर्षी शेतकऱ्यांना साधणे अशक्य आहे. हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी