शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:46 IST

गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देथंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगारआतातरी कलमे मोहरण्याची अपेक्षा

रत्नागिरी : गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

पौष महिना सुरू झाला असून, पौष महिन्यात फळधारणा कमी होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचे सातत्य कायम राहून मोहोर प्रक्रिया सुरू झाली तर फळधारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवी नसलेल्या झाडांचे प्रमाण १५ ते २० टक्के होते. परंतु अवेळच्या पावसामुळे या झाडांनाही पालवी आली. मात्र, काही ठिकाणी मोहोर आला असला तरी हे प्रमाण अवघे १० टक्केच होते. या मोहोरावर सध्या थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. थ्रीप्सपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत असून, उत्पादनापेक्षा खर्चच अधिक आहे.ऑक्टोबरमध्ये आलेली पालवी जून होत असून, थंडीमुळे पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. शिवाय कोवळ्या पालवीलादेखील अंकुर येण्याची शक्यता आहे. पालवीवर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुडतुड्यावर कीटकनाशक फवारणी करून नियंत्रणात आणला आहे. मात्र किडीमुळे शेतकरी हैराण असून, कृषी विभागदेखील या किडीबाबत साशंक आहे. शेतकरी बांधव कृषिसेवकांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करीत आहेत.पालवीवर किडींचा प्रादुर्भावअत्यल्प मोहोर असणाऱ्या झाडांना सध्या साबुदाणा, वाटाणा आकारातील फळधारणा झाली आहे. थंडी वाढली तर फळधारणा झालेल्या झाडांना पुनर्मोहोराचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे पीक सध्यातरी निसर्गावर अवलंबून आहे. विविध संकटातून वाचलेले पीक २० मार्चनंतर बाजारात येण्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाणही अत्यल्प असणार आहे.उत्पादन वाचविण्यासाठी खर्च अधिकगतवर्षी जानेवारीत ३० ते ४० टक्के मोहोर होता. यावर्षी जेमतेम १० टक्के आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बाजारात आला होता. यावर्षी मात्र आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता असून, गुढीपाडव्याचा मुहूर्त यावर्षी शेतकऱ्यांना साधणे अशक्य आहे. हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी