शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

जिल्ह्यात ७८ कोटी २६ लाखाची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:07 IST

mahavitran, counsumar, ratnagirinews वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७८ कोटी २६ लाखाची थकबाकीथकबाकी वसुलीसाठी महावितरणपुढे मोठे आव्हान

मेहरून नाकाडेरत्नागिरी : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. एक लाख ३९ हजार ९५९ ग्राहकांकडे ४० कोटी ८८ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. एप्रिलपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्यिकच्या १७ हजार ५०४ ग्राहकांकडे १५ कोटी २९ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत.थकीत वीजबिल भरण्याचे शासन आदेश आल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून वीजबिल भरण्याची विनवणी करण्यात येणार आहे. थकबाकीची रक्कम एकाचवेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने सात हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे दिली जाणार आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली असल्याने वसुलीचे फार मोठे आव्हान महावितरणपुढे उभे राहिले आहे. वाढीव बिलांबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेही वसुलीचे प्रमाण वाढत चालले आहे., सहकार्य करावे.

कोरोना व निसर्ग चक्रीवादळ काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे.- देवेंद्र सायनेकर,प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी