शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

सेनेचे आता कायमच स्वबळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 01:24 IST

रत्नागिरी नगरपरिषद : सेना - भाजपमधील मतभेद विकोपास

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने यश संपादन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा घंटानाद केला आहे. नगरपरिषदेतील सेना-भाजपमधील मतभेदांची दरी वाढली असून, येत्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सेनेने स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची चार वर्षांपूर्वी झालेली सार्वत्रिक निवडणूक सेना-भाजप यांनी युती करून लढवली होती. त्यावेळी रत्नागिरीकरांनी युतीला भरभरून मतदान केले होते. तब्बल २१ जागांवर युतीला विजय संपादन करता आला होता. त्यावेळी राज्यभरातही युती जोरात होती. सेना व भाजप या दोन्ही पक्षांनी आपसात सव्वा-सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मिलिंद कीर यांना पहिल्या सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपद मिळाले. दुसऱ्या सव्वा वर्षाच्या काळासाठी भाजपचे अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षपद भुषविले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटली व त्याचा परिणाम रत्नागिरी नगरपरिषदेतही झाला. सेनेला दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्षपद न दिल्याने सेना व भाजपमध्ये त्यानंतर सातत्याने वाद सुरू आहेत. २ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या चार जागांच्या पोटनिवडणुकीतही सेना-भाजपची युती झाली नाही. त्यानंतर १० जानेवारी २०१६ ला झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीतही सेनेने भाजपकडे पाठिंबा मागितला असता ती जागाच भाजपने मागितली. मात्र सेनेने त्यास नकार दिला. भाजपनेही सेनेच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा केला. एकूणच भाजप व सेना या दोन्ही पक्षांतील रत्नागिरी नगरपरिषदेमधील मतभेद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)युती नकोच : नोव्हेंबरच्या निवडणुकीत सत्तास्थापनेची तयारी...रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेतील सर्वांनीच एकत्र येऊन सेना उमेदवाराला विजयी केले आहे. नगरपरिषदेत सेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे. एकट्याच्या बळावरही अधिक मतांचा फरक मिळवून दाखविणाऱ्या सेनेने येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकीतही ‘एकला चलो’रे ची तयारी सुरू केली आहे. भाजपशी युती नकोच असे शिवसैनिकांचे मत असून जे प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत घडले तेच नोव्हेंबरच्या पोटनिवडणुकीतही रत्नागिरीकरांच्या सहकार्याने घडेल, असा शिवसैनिकांना विश्वास वाटत असून, राष्ट्रवादी व भाजप सेनेच्या या आव्हानाला कसे तोंड देणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.