शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सेना आमदार एकवटले

By admin | Updated: December 9, 2015 01:14 IST

मुख्यमंत्र्यांना पत्र : नुकसानभरपाई हमीपत्राद्वारे द्यावी

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल २०१५मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबतची शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई संमत्तीपत्राच्या जाचक अटीमुळे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई हमीपत्राद्वारे मिळावी, अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या चार आमदारांनी आज (मंगळवार) नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मागणीचे हे पत्र देणाऱ्या सेनेच्या आमदारांमध्ये राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण व वैभव नाईक यांचा समावेश होता. नुकसानग्रस्तांना शासनाकडून सिंधुदुर्गसाठी ३७ कोटी ९१ लाख ५६ हजार, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ७५ हजार भरपाई मंजूर करण्यात आली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळपीक बागायतदारांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी २५ हजार भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअंतर्गत सिंधुदुर्गमध्ये १२ कोटी ३५ लाख ५६ हजार ३९४ रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यात २७ कोटी ७१ लाख ६८ हजार ८६६ रुपये नुकसान भरपाईचे महसूल विभागाकडून वाटप करण्यात आले. संमत्तीपत्राच्या अटीमुुळे पूर्ण भरपाई बागायतदारांना मिळालेली नाही. त्यामुळे हमीपत्राद्वारे भरपाई दिली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी) खराब हवामान : सात वर्षे आंबा, काजू पिकाचे नुकसान... रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसाठी महत्त्वाचे असलेले आंबा व काजू पीक गेल्या सहा ते सात वर्षांपासून अवकाळी पाऊस व लहरी हवामान यामुळे धोक्यात आले आहे. गेल्या हंगामात गारपिटीचाही सामना या पिकाला करावा लागला. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच संमत्तीपत्राची अडचण आल्याने बागायतदारांना अपूर्ण भरपाई मिळाली आहे.