शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

सेना आमदार एकवटले

By admin | Updated: December 9, 2015 01:14 IST

मुख्यमंत्र्यांना पत्र : नुकसानभरपाई हमीपत्राद्वारे द्यावी

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल २०१५मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबतची शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई संमत्तीपत्राच्या जाचक अटीमुळे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई हमीपत्राद्वारे मिळावी, अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या चार आमदारांनी आज (मंगळवार) नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मागणीचे हे पत्र देणाऱ्या सेनेच्या आमदारांमध्ये राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण व वैभव नाईक यांचा समावेश होता. नुकसानग्रस्तांना शासनाकडून सिंधुदुर्गसाठी ३७ कोटी ९१ लाख ५६ हजार, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ७५ हजार भरपाई मंजूर करण्यात आली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळपीक बागायतदारांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी २५ हजार भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअंतर्गत सिंधुदुर्गमध्ये १२ कोटी ३५ लाख ५६ हजार ३९४ रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यात २७ कोटी ७१ लाख ६८ हजार ८६६ रुपये नुकसान भरपाईचे महसूल विभागाकडून वाटप करण्यात आले. संमत्तीपत्राच्या अटीमुुळे पूर्ण भरपाई बागायतदारांना मिळालेली नाही. त्यामुळे हमीपत्राद्वारे भरपाई दिली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी) खराब हवामान : सात वर्षे आंबा, काजू पिकाचे नुकसान... रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसाठी महत्त्वाचे असलेले आंबा व काजू पीक गेल्या सहा ते सात वर्षांपासून अवकाळी पाऊस व लहरी हवामान यामुळे धोक्यात आले आहे. गेल्या हंगामात गारपिटीचाही सामना या पिकाला करावा लागला. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच संमत्तीपत्राची अडचण आल्याने बागायतदारांना अपूर्ण भरपाई मिळाली आहे.