शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रत्नदुर्ग किल्ल्यावर उद्या साजरा होणार आरमार विजय दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:20 IST

शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी

ठळक मुद्देअठरा पगड समाजबांधवांचे शोभायात्रेसह आगमनभागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे.

रत्नागिरी : शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी समाज आणि अठरा पगड समाजांच्यावतीने रविवार, २५ रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर ‘आरमार विजय दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शोभायात्रा तसेच इतिहास संशोधक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. अजिंक्य समजल्या जाणाºया इंग्रजांना १८ सप्टेंबर १६७८ रोजी समुद्री हल्ल्यात पराभूत करण्याचा असामान्य पराक्रम रत्नागिरीचे सुपुत्र दर्यासारंग  मायनाक भंडारी, दौलतखान आणि अठरा पगड जातींच्या त्यांच्या शिलेदारांनी केला.  त्यामुळे बहुजन समाजाचा हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी १८ सप्टेंबर हा दिवस आरमार विजय दिन म्हणून गेल्या काही वर्षांपासून तालुका भंडारी समाज तसेच बहुजन समाजातर्फे साजरा करण्यात येत आहे. 

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर हा आरमार विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. तालुका भंडारी समाजाबरोबरच कुणबी समाजोन्नती संघ, तेली सेवा संघ, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, खारवी समाज विकास समिती, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ, लिंगायत सेवा संघ, नामदेव शिंपी समाज मंडळ, परिट समाज सेवा संघ, भोई समाज, धनगर समाज संघ, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, कोळी समाज, सुतार समाज संघ, गाबित समाज, कुंभार समाज, आगरी समाज आदींच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी ३.३० वाजता भागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या वेषभूषा केलेल्या समाजबांधव यात सहभागी होणार आहेत. यावेळी रत्नदुर्ग किल्ला येथे भागोजीशेठ कीर यांच्या नावाच्या पाटीचे अनावरण होणार आहे. त्यानंतर याठिकाणी इतिहास संशोधक तसेच विविध समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगड