शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

अर्जुना परिसराला भरतीचा तडाखा

By admin | Updated: January 25, 2015 00:53 IST

शेतकरी भयग्रस्त : शेतात पाणी घुसल्याने नुकसान

राजापूर : मागील ६० ते ७० वर्षांत कधी आली नाही, एवढी भरती दोन दिवसांपूर्वी आल्याने खाडीकाठावरील अनेक लगतच्या गावातील शेतजमिनीत खारे पाणी घुसून, मोठ्या प्रमाणात तयार पिकांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टर जमीन पुढील काही वर्षांसाठी नापीक बनण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील अर्जुना नदीकाठानजीक तसेच खाडी किनाऱ्यालगत असणारे विल्ये, गोवळ, शिवणे पडवे, अणसुरे पाखाडी या गावातील शेतकऱ्यांना या मोठ्या भरतीचा फटका बसला आहे. दरवर्षी या गावातील अनेक शेतकरी वरणा, उडीद, कुळीथ, मिरची, वांगी, वाल यासहित विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊन त्यावर आपली उपजीविका करीत असतात. स्थानिक बाजारपेठेत या मालाची विक्री होत असते. मात्र या समस्त शेतकऱ्यांना गत मंगळवारी आलेल्या भरतीने दणका दिला आहे. या गावातील बुजुर्ग मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार मागील ६० ते ७० वर्षात एवढी मोठी भरती कधीच आली नव्हती. या भरतीचे पाणी आजूबाजूच्या भातशेतीच्या जमिनीत घुसले असून, त्यामुळे अनेक ठिकाणची तयार पीकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहेच. शिवाय परिसरातील मोठ्या प्रमाणातील भातजमिनी नापीक बनण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे, स्थानिक शेतकऱ्यांपुढील प्रश्न अधिक जटील बनला आहे. येऊन गेलेल्या भरतीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी सागवे जिल्हापरिषद सदस्य अजित नारकर, अणसुरे पंचायत समिती सदस्या रेखा कोंडकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब मराठे, आपटे गावचे पोलीस पाटील आदींनी केली आहे. अचानक आलेल्या मोठ्या भरतीने स्थानिक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण कायम आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीकाठी असलेल्या शेतजमिनीचे नुकसान दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रचंड भरतीमुळे झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासकीय यंत्रणेने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) सत्तर वर्षांत प्रथमच भरतीचे पाणी गावात घुसले. विल्ये, अणसुरे, पडवे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. भातशेतीबरोबरच हिवाळी भाजीपालाही वाया. संभाव्य धोका टाळण्यासाठी महसूलकडे धाव. पंचनामे कधी करणार. महसूल पथक गावात येणार.