शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अर्जुना परिसराला भरतीचा तडाखा

By admin | Updated: January 25, 2015 00:53 IST

शेतकरी भयग्रस्त : शेतात पाणी घुसल्याने नुकसान

राजापूर : मागील ६० ते ७० वर्षांत कधी आली नाही, एवढी भरती दोन दिवसांपूर्वी आल्याने खाडीकाठावरील अनेक लगतच्या गावातील शेतजमिनीत खारे पाणी घुसून, मोठ्या प्रमाणात तयार पिकांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टर जमीन पुढील काही वर्षांसाठी नापीक बनण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील अर्जुना नदीकाठानजीक तसेच खाडी किनाऱ्यालगत असणारे विल्ये, गोवळ, शिवणे पडवे, अणसुरे पाखाडी या गावातील शेतकऱ्यांना या मोठ्या भरतीचा फटका बसला आहे. दरवर्षी या गावातील अनेक शेतकरी वरणा, उडीद, कुळीथ, मिरची, वांगी, वाल यासहित विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊन त्यावर आपली उपजीविका करीत असतात. स्थानिक बाजारपेठेत या मालाची विक्री होत असते. मात्र या समस्त शेतकऱ्यांना गत मंगळवारी आलेल्या भरतीने दणका दिला आहे. या गावातील बुजुर्ग मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार मागील ६० ते ७० वर्षात एवढी मोठी भरती कधीच आली नव्हती. या भरतीचे पाणी आजूबाजूच्या भातशेतीच्या जमिनीत घुसले असून, त्यामुळे अनेक ठिकाणची तयार पीकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहेच. शिवाय परिसरातील मोठ्या प्रमाणातील भातजमिनी नापीक बनण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे, स्थानिक शेतकऱ्यांपुढील प्रश्न अधिक जटील बनला आहे. येऊन गेलेल्या भरतीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी सागवे जिल्हापरिषद सदस्य अजित नारकर, अणसुरे पंचायत समिती सदस्या रेखा कोंडकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब मराठे, आपटे गावचे पोलीस पाटील आदींनी केली आहे. अचानक आलेल्या मोठ्या भरतीने स्थानिक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण कायम आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीकाठी असलेल्या शेतजमिनीचे नुकसान दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रचंड भरतीमुळे झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासकीय यंत्रणेने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) सत्तर वर्षांत प्रथमच भरतीचे पाणी गावात घुसले. विल्ये, अणसुरे, पडवे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. भातशेतीबरोबरच हिवाळी भाजीपालाही वाया. संभाव्य धोका टाळण्यासाठी महसूलकडे धाव. पंचनामे कधी करणार. महसूल पथक गावात येणार.