शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

मुंबईतील बोट दुर्घटनेत दाभोळतील आरीफ बामणे बनले ‘लाईफ जॅकेट’, बचावकार्य दरम्यानचा सांगितला अनुभव

By अरुण आडिवरेकर | Updated: December 23, 2024 16:50 IST

बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा

रत्नागिरी : मुंबईतील गेट वे ऑफ येथील ‘नीलकमल’ बोटीला अपघात झाल्यानंतर दापोली तालुक्यातील दाभोळ येथील आरीफ बामणे तातडीने मदत कार्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. साडेतीन वर्षाच्या मुलीसह अन्य नागरिकांना वाचविण्यासाठी मदत केली. यावेळी २० ते २५ जणांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समुद्रात बुडणाऱ्या नागरिकांसाठी जणू ते ‘लाईफ जॅकेट’च बनून आले हाेते.आरीफ बामणे हे मुंबईत पायलट बोटीवर कामाला आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथे नीलकमल बाेटीला अपघात झाला, त्यावेळीही ते आपली सेवा बजावत होते. ते काम करत असलेल्या बोटीवर अपघाताची सूचना मिळाली आणि ते बाेट घेऊन त्या दिशेने निघाले. तिथे पोहोचल्यानंतर बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.सगळीकडून ‘आम्हाला वाचवा..वाचवा..’ अशा किंकाळ्या ऐकू येत होत्या. सगळेच मदत मागत होते. त्यामुळे काय करावे काहीच सुचत नव्हते. ज्यांच्याकडे लाइफ जाकीट नव्हते त्यांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला. बामणे यांनी जवळपास २० ते २५ जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मदत कार्य करताना एक साडेतीन वर्षाची मुलगी त्यांनी पाहिले. तिला हातात घेताच तिचा श्वास बंद असल्याचे लक्षात आले. बुडणाऱ्यांना वाचविण्याबाबत थाेडी माहिती असल्याने त्याचा उपयाेग करुन त्या मुलीच्या पाेटातील पाणी बाहेर काढले. काही वेळातच तिचा श्वास सुरु झाला आणि समाधान वाटले, असे बामणे यांनी सांगितले.

१० ते २० मिनिटांची ही धक्कादायक घटना आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली. या आधी कधी इतका मोठा अपघात पाहिला नव्हता. आमच्या आधी पेट्रोलिंग बोट व दुसरी बोट होती; पण आम्ही गेल्यानंतर अधिक लोकांना वाचविण्यात यश आले. बुडणाऱ्यांची तेथील परिस्थिती पाहून खूप वाईट वाटत होते. जेवढे शक्य झाले तेवढ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. - आरीफ बामणे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईdrowningपाण्यात बुडणे