शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील बोट दुर्घटनेत दाभोळतील आरीफ बामणे बनले ‘लाईफ जॅकेट’, बचावकार्य दरम्यानचा सांगितला अनुभव

By अरुण आडिवरेकर | Updated: December 23, 2024 16:50 IST

बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा

रत्नागिरी : मुंबईतील गेट वे ऑफ येथील ‘नीलकमल’ बोटीला अपघात झाल्यानंतर दापोली तालुक्यातील दाभोळ येथील आरीफ बामणे तातडीने मदत कार्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. साडेतीन वर्षाच्या मुलीसह अन्य नागरिकांना वाचविण्यासाठी मदत केली. यावेळी २० ते २५ जणांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समुद्रात बुडणाऱ्या नागरिकांसाठी जणू ते ‘लाईफ जॅकेट’च बनून आले हाेते.आरीफ बामणे हे मुंबईत पायलट बोटीवर कामाला आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथे नीलकमल बाेटीला अपघात झाला, त्यावेळीही ते आपली सेवा बजावत होते. ते काम करत असलेल्या बोटीवर अपघाताची सूचना मिळाली आणि ते बाेट घेऊन त्या दिशेने निघाले. तिथे पोहोचल्यानंतर बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.सगळीकडून ‘आम्हाला वाचवा..वाचवा..’ अशा किंकाळ्या ऐकू येत होत्या. सगळेच मदत मागत होते. त्यामुळे काय करावे काहीच सुचत नव्हते. ज्यांच्याकडे लाइफ जाकीट नव्हते त्यांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला. बामणे यांनी जवळपास २० ते २५ जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मदत कार्य करताना एक साडेतीन वर्षाची मुलगी त्यांनी पाहिले. तिला हातात घेताच तिचा श्वास बंद असल्याचे लक्षात आले. बुडणाऱ्यांना वाचविण्याबाबत थाेडी माहिती असल्याने त्याचा उपयाेग करुन त्या मुलीच्या पाेटातील पाणी बाहेर काढले. काही वेळातच तिचा श्वास सुरु झाला आणि समाधान वाटले, असे बामणे यांनी सांगितले.

१० ते २० मिनिटांची ही धक्कादायक घटना आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली. या आधी कधी इतका मोठा अपघात पाहिला नव्हता. आमच्या आधी पेट्रोलिंग बोट व दुसरी बोट होती; पण आम्ही गेल्यानंतर अधिक लोकांना वाचविण्यात यश आले. बुडणाऱ्यांची तेथील परिस्थिती पाहून खूप वाईट वाटत होते. जेवढे शक्य झाले तेवढ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. - आरीफ बामणे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईdrowningपाण्यात बुडणे