शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:27 IST

अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देलागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणीलग्नाची बेडी नाटकाच्या प्रयोगासाठी एकही रूपया घेतला नाही

शोभना कांबळेरत्नागिरी : सामाजिक कृतज्ञता निधी संकलनाचे काम महाराष्टभर सुरू होते. या निधीला हातभार लावण्यासाठी डॉ. श्रीराम लागू यांनी पुढाकार घेऊन लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग मानधनाचा एकही पैसा न घेता महाराष्ट्रात केले आणि त्यातून निधी गोळा केला. या नाटकाच्या निमित्ताने डॉ. लागू रत्नागिरीत आणि चिपळुणात आले होते.

अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याच्या आठवणी हेगशेट्ये यांनी जाग्या केल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अभिजीत हेगशेट्ये यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती.

सामाजिक संस्थेत काम करताना पैशांची अपेक्षा कधीच केली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. दाभोलकर आणि डॉ. लागू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम १९९६-९७च्या सुमारास सुरू झाला होता.

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, मालवण यानंतर रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी लग्नाची बेडी हे नाटक झाले. त्यावेळी डॉ. लागू यांच्यासह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी, रिमा लागू, भारती आचरेकर आदी मातब्बर कलाकार रत्नागिरीत आले होते.डॉ. लागू यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल हेगशेट्ये म्हणाले की, डॉ. लागू हे मोठे व्यक्तिमत्व होते. मात्र, ते सामान्यांसारखेच राहिले. प्रत्यक्षात ते नटसम्राट होते. कित्येक दशके त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. रंगमंचावरील डॉ. लागू आणि प्रत्यक्षातील डॉ. लागू हे वेगळेच असायचे. ते पक्के तत्वनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होते.

सामाजिक जाणीव असल्याने सामाजिक बांधिलकी मानणारे होते. म्हणूनच लग्नाची बेडी या नाटकाचे सलग प्रयोग करताना नाटकाच्या टीममधील एकाही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने मानधनाचा एकही पैसा घेतला नाही. हे केवळ डॉ. लागूंमुळे झाले. कारण नाट्यक्षेत्रात त्यांचे दादा व्यक्तिमत्व होते.तिकीट विक्रीतून १ लाख ६० हजार जमारत्नागिरीतील निधी संकलनासाठी जे. के. फाईल्सचे तत्कालिन सरव्यवस्थापक सर्वोत्तम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत आप्पा बेर्डे, भाई बेर्डे ही मंडळी होती. या सर्वांच्या सहकार्याने लग्नाची बेडी नाटकाच्या तिकीट विक्रीतून त्याकाळी तब्बल १ लाख ६० हजार रूपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी रत्नागिरीतून गोळा करण्यात आला होता. डॉ. लागू यांनी कोणतेही मानधन न घेता या नाटकाचे प्रयोग केले होते. 

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूRatnagiriरत्नागिरी