शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रत्नागिरी : रिफायनरीविरोधी शिवसेनेची आंदोलने लुटुपूटूची : अशोक वालम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:46 IST

रिफायनरीविरोधात शिवसेना सुरुवातीपासून आहे हे धादांत खोटे आहे. कारण, मुख्यमंत्री जानेवारी २०१६ पासून कोकणात पश्चिम किनारपट्टीवर रिफायनरीसाठी जागा देणार, असे केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री याना सांगत होते तेंव्हा कधी सेना नेत्यांनी त्यास विरोध केला नाही.

ठळक मुद्देरिफायनरीविरोधी शिवसेनेची आंदोलने लुटुपूटूची : अशोक वालमराजन साळवी यांच्या विधानांचा घेतला समाचार

राजापूर : रिफायनरीविरोधात शिवसेना सुरुवातीपासून आहे हे धादांत खोटे आहे. कारण, मुख्यमंत्री जानेवारी २०१६ पासून कोकणात पश्चिम किनारपट्टीवर रिफायनरीसाठी जागा देणार, असे केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री याना सांगत होते तेंव्हा कधी सेना नेत्यांनी त्यास विरोध केला नाही.

मोदींनी एप्रिल २०१६ रोजी सौदीच्या सुलतानाला कोकणात रिफायनरी उभारण्याबद्दल आश्वस्त केले, तरीही सेनेचा विरोध दिसला नाही. उलट शिवसेनेने रिफायनरीविरोधी लुटुपूटूची आंदालने करून स्थानिकांच्या डोळ्यात धूळ फेकल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी म्हटले आहे.आमदार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी वालम यांच्यावर आरोप केले होते. त्याचा समाचार वालम यांनी घेतला आहे. सप्टेंबर २०१६ रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन महाराष्ट्र औद्योगीक विकास अधिनियम, १९६१अंतर्गत रिफायनरी साठी भूसंपादन करायचे ठरले, तेव्हाही सेनेचे नेते गप्पच होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे अगदी मार्च २०१८पर्यंत रिफायनरीची भलावणच करीत होते.मुख्यमंत्री अध्यादेश रद्द करीत नाहीत म्हणून शिवसेनेने फडणवीस सरकारला अडचणीत आणले असे कधी दिसले नाही. उलट अमित शाह भेट, संसदेतील अविश्वास ठरावाचेवेळी बोटचेपीच भूमिका सेनेने घेतली. स्थानिक पातळीवर लुटुपुटूची आंदोलन करताना मात्र यांचे आमदार-खासदार दिसत होते.

१२ सप्टेंबर १७ रोजी आमदार राजन साळवी मुख्यमंत्र्यांशी स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसहित २७ मागण्या घेऊन गेले आणि या मागण्या मान्य झाल्यास आम्हाला प्रकल्प मान्य आहे असे सांगितले. हा ग्रामस्थांचा मोठा विश्वासघात होता. कुणालाही न विचारता त्यांनी हे जे पाऊल उचलले ते साफ चुकीचे होते, असे वालम यांनी म्हटले आहे.२० नोव्हेंबर २०१७ रोजी संयुक्त जमीन मोजणी सुरु होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांना आठवडाभर आधीच पत्र देण्यात आली. पण कसलीही हालचाल सेनेमार्फत झाली नाही. शेवटी आम्ही जनतेने रस्त्यावर उतरून मोजणी थांबिवली. उद्योगमंत्र्यांची अध्यादेश रद्द करण्याची घोषणा आणि कागदोपत्री कार्यवाही मंत्रालयात धूळ खात पडलेली आहे.

सरकारमार्फत मात्र अजून सुकथनकर समितीसारखे प्रकल्प समर्थनार्थ कारवाया सुरूच आहेत. म्हणूनच शिवसेनाच हा दावा की सुरुवातीपासून रिफायनरी ला विरोध आहे ,हे पूर्ण असत्य आहे, असे वालम यांनी म्हटले आहे.प्र्रकल्पग्रस्त गावातील ५३ शेकडो वर्षे जुनी मंदिरे, जी स्थानिक जनतेची श्रद्धास्थाने आहेत, ती रिफायनरी करता भुईसपाट करण्यात येण्याचे प्रस्तावित आहेत.

स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भक्तिभावाचे सोयर-सुतक सेनेला नाही. दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, यापुढे नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनात शिवसेना कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या कुठल्याच आंदोलनात सहभागी होणार नाही.वास्तविक शिवसेना आतापर्यंत आम्ही संघटनेने गेल्या दिड वर्षांत केलेल्या नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनात कधी उतरलीच नाही. मग हे काही राजन साळवींनी नवीन सांगितले नाही. खरंतर सुरवाती पासून जे त्यांच्या पोटात होते ते आता ओठातून आले, असे वालम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी