शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

...अन् संदेश झाला शेतकरी, कोरोनामुळे परतला गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:33 IST

agriculture Ratnagiri-रत्नागिरी तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला. नोकरीला लागून जेमतेम वर्षच झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले व नोकरी गेली. गावाकडे परतल्यानंतर सहा महिने काय करावे, हाच विचार सुरू होता. अखेर शेती करण्याचा निर्णय संदेशने घेतला. सहा महिने त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त होऊ लागल्याने भविष्यात शेतीच करायचा निर्णय त्याने घेतला आहे.

ठळक मुद्दे...अन् संदेश झाला शेतकरी, कोरोनामुळे परतला गावीसहा महिने काय करावे?, कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला. नोकरीला लागून जेमतेम वर्षच झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले व नोकरी गेली. गावाकडे परतल्यानंतर सहा महिने काय करावे, हाच विचार सुरू होता. अखेर शेती करण्याचा निर्णय संदेशने घेतला. सहा महिने त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त होऊ लागल्याने भविष्यात शेतीच करायचा निर्णय त्याने घेतला आहे.संदेशने आपला मित्र योगेश याला ही कल्पना सांगतातच, योगेशच्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. योगेश व धाकटा भाऊ सुयोग यांच्या मदतीने गावातील पडीक जमीन मक्तेदारी पद्धतीने घेऊन त्यामध्ये कलिंगड, भेंडी, वाली, वांगी, मका, मटार, हिरवी मिरची, काकडी लागवड केली असून, उत्पादन सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजन केले. भाड्याने ट्रॅक्क्टर घेऊन नांगरणी केली. वाफे तयार करून प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र भाग केले आहेत. लागवडीसाठी नर्सरीतून चांगल्या प्रकारची रोपे विकत आणली.खत व्यवस्थापन, योग्य नियोजन, यामुळे पिकेही तरारली व उत्पादन सुरू झाले. विक्रीवरही स्वत:च लक्ष केंद्रीत केले आहे. शेतीमध्ये पैसा वाचवायचा असेल, तर अंगमेहनत प्रचंड आहे. चिकाटी व प्रयत्नाची जोड असेल, तर यश नक्कीच प्राप्त होते, म्हणून संदेशने आता नोकरीच्या मागे न लागता भविष्यात शेतीच करण्याचा निर्णय घेतला असून पावसाळ्यात कारली, भेंडी उत्पादन घेण्याचा मानस आहे.कलिंगड पीक धोक्यातउष्म्यामुळे कलिंगडाचा खप चांगला होतो. त्यामुळे संदेशने कलिंगडाचे दोन स्वतंत्र प्लॉट तयार करून लागवड केली. एका प्लॉटमध्ये चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दुसऱ्या प्लॉटवर वेलमर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कलिंगडांची वाढ खुंटली आहे. यामुळे निराश न होता, नव्या उमेदीने संदेश मेहनत घेत आहे. घरची सहा गुंठे जमीन, स्वत: शेतातही कधी न गेलेल्या संदेशने आता शेतीच करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी