शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

निवडणूक लवकर जाहीर करा!

By admin | Updated: August 21, 2016 22:36 IST

माध्यमिक शाळा सेवक पतपेढी : उपनिबंधकांकडे ठराव पाठवणार

टेंभ्ये : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभेच्या सुरुवातीलाच उपस्थित सभासदांनी पंचवार्षिक निवडणूक कधी जाहीर होणार? असा प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या कार्यरत संचालक मंडळाची मुदत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपली असतानाही जिल्हा उपनिबंधकांनी अद्याप निवडणूक कार्यक्रम का जाहीर केला नाही, असे अनेक प्रश्न सभासदांनी उपस्थित केले. अखेर निवडणूक कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करण्यासंदर्भातील ठराव उपनिबंधकांकडे पाठविण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतपेढीच्या प्रधान कार्यालयात पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. किरण लोहार यांनी सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. वार्षिक अहवालाच्या मुखपृष्ठावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचत्य साधून छायाचित्र छापल्याबद्दल माध्यमिक अध्यापक संघाचे अभिनंदनपर पत्र सुरुवातीला वाचण्यात आले. त्यानंतर इतिवृत्ताचे वाचन सुरु असतानाच सभासदांनी पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना अध्यक्ष धोंडीराम संदे यांनी पतपेढीने मतदार याद्या ६ महिन्यांपूर्वी सहाय्यक निबंधकांकडे सादर केल्याचे सांगितले. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर लाभांश वाढीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कर्जमर्यादा वाढविण्याबाबतदेखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभेच्या शेवटी अध्यक्ष, सर्व संचालक यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा असल्याचे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारत घुले, सी. एस. पाटील, गजानन पाटणकर, इ. एस. पाटील, सागर पाटील, रामचंद्र महाडिक, बशीर मुजावर यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते. आभार संचालक सत्यवान शिंदे यांनी मानले. (वार्ताहर) संदे : प्रलंबित प्रकरणांचा परिणाम नाही माध्यमिक पतपेढीच्या घटना दुरुस्ती संदर्भात सहनिबंधक व सहकार न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे अध्यक्ष धोंडीराम संदे यांनी स्पष्ट केले. यावर सभासदांनी निवडणुकीच्या विलंबास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला.