शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

शासनाची दमडीही न मिळाल्याने चिपळुणातील व्यापाऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

चिपळूण : शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या विविध घटकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने व्यापारी ...

चिपळूण : शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या विविध घटकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने व्यापारी व दुकानदार, व्यावसायिकांसाठी पन्नास हजारांची मदत जाहीर केली. मात्र, सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी या व्यापारी व दुकानदारांना शासनाने जाहीर केलेली दमडीची मदतही मिळालेली नाही. यामुळे चिपळूण परिसरातील पूरग्रस्त व्यापारी व दुकानदार प्रचंड संतापले आहेत. या संतापाच्या भावनेतूनच त्यांनी बुधवारी तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाने जाहीर केलेली मदतीची रक्कम न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोरच उपोषण छेडण्याचा इशारा येथील व्यापारी महासंघाने दिला आहे.

शहरासह, खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, मिरजोळी, पेढे, मजरे काशी या परिसरात २२ जुलै रोजी महापुराचे पाणी भरले होते. महापुरात ९० टक्के चिपळूण बाधित झाले होते. तळमजला तसेच काही ठिकाणी पहिल्या मजल्यावर पाणी शिरले होते. यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. व्यापारी व दुकानदार यांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. व्यापारी अजूनही नुकसानीतून सावरलेले नाहीत. काही व्यापाऱ्यांची दुकाने अजून बंदच आहेत. व्यापारी बांधवांना उभारी मिळण्यासाठी शासनाने पन्नास हजारांची सरसकट मदत जाहीर केली होती. मात्र, अद्याप ही मदत वितरित झालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी तहसील कार्यालय गाठले.

यावेळी व्यापारी महासंघाचे अरुण भोजने म्हणाले की, सव्वा महिना होऊन गेला, तरी पूर परिस्थितीसाठी अजून नेते भेटीसाठी बोलवत आहेत आणि आम्ही जातोय. सव्वा महिना सरकारने काय केले? ५० हजार रुपयांसाठी किती लाचार व्हायचे? विमा नियमावलीमध्ये कवडीचाही बदल झाला नाही आणि होणारही नाही. कोणाचा विमा ताळेबंदानुसार नाही, कुणाच्या मालाचा विमा न काढता दुकानाचा केलेला आहे, कोणाच्या बँकेने विम्याचे नूतनीकरण केलेले नाही, कोणाचे पंचनामे चुकीचे आहेत, कोणाचा माल वाहून गेलाय, काही बँका पाण्यात गेल्यामुळे त्यांची इन्शुरन्स पॉलिसी मिळत नाही, अशी अनेक कारणे विमा कंपन्या देत आहेत. त्यातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप दिलेली नाही.

निवेदन देताना व्यापारी महासंघाचे शिरीष काटकर, उदय ओतारी, अरुण भोजने, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

चौकट

५ टक्के कर्जाची घोषणाही हवेतच विरली

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना ५ टक्क्यांनी कर्ज देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली आहे. अनेक दुकानदारांना नवीन मालाच्या खरेदीसाठी खिशात दमडी नाही. ते नव्याने उभारी घेणार तरी कशी? त्यामुळे ८ दिवसांत भरपाईची रक्कम व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. भरपाई जमा न केल्यास नाइलाजास्तव उपोषण छेडावे लागेल, असा इशाराही दिला आहे.

फोटो

चिपळूण व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले.