शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

शासनाची दमडीही न मिळाल्याने चिपळुणातील व्यापाऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

चिपळूण : शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या विविध घटकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने व्यापारी ...

चिपळूण : शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या विविध घटकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने व्यापारी व दुकानदार, व्यावसायिकांसाठी पन्नास हजारांची मदत जाहीर केली. मात्र, सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी या व्यापारी व दुकानदारांना शासनाने जाहीर केलेली दमडीची मदतही मिळालेली नाही. यामुळे चिपळूण परिसरातील पूरग्रस्त व्यापारी व दुकानदार प्रचंड संतापले आहेत. या संतापाच्या भावनेतूनच त्यांनी बुधवारी तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाने जाहीर केलेली मदतीची रक्कम न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोरच उपोषण छेडण्याचा इशारा येथील व्यापारी महासंघाने दिला आहे.

शहरासह, खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, मिरजोळी, पेढे, मजरे काशी या परिसरात २२ जुलै रोजी महापुराचे पाणी भरले होते. महापुरात ९० टक्के चिपळूण बाधित झाले होते. तळमजला तसेच काही ठिकाणी पहिल्या मजल्यावर पाणी शिरले होते. यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. व्यापारी व दुकानदार यांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. व्यापारी अजूनही नुकसानीतून सावरलेले नाहीत. काही व्यापाऱ्यांची दुकाने अजून बंदच आहेत. व्यापारी बांधवांना उभारी मिळण्यासाठी शासनाने पन्नास हजारांची सरसकट मदत जाहीर केली होती. मात्र, अद्याप ही मदत वितरित झालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी तहसील कार्यालय गाठले.

यावेळी व्यापारी महासंघाचे अरुण भोजने म्हणाले की, सव्वा महिना होऊन गेला, तरी पूर परिस्थितीसाठी अजून नेते भेटीसाठी बोलवत आहेत आणि आम्ही जातोय. सव्वा महिना सरकारने काय केले? ५० हजार रुपयांसाठी किती लाचार व्हायचे? विमा नियमावलीमध्ये कवडीचाही बदल झाला नाही आणि होणारही नाही. कोणाचा विमा ताळेबंदानुसार नाही, कुणाच्या मालाचा विमा न काढता दुकानाचा केलेला आहे, कोणाच्या बँकेने विम्याचे नूतनीकरण केलेले नाही, कोणाचे पंचनामे चुकीचे आहेत, कोणाचा माल वाहून गेलाय, काही बँका पाण्यात गेल्यामुळे त्यांची इन्शुरन्स पॉलिसी मिळत नाही, अशी अनेक कारणे विमा कंपन्या देत आहेत. त्यातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप दिलेली नाही.

निवेदन देताना व्यापारी महासंघाचे शिरीष काटकर, उदय ओतारी, अरुण भोजने, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

चौकट

५ टक्के कर्जाची घोषणाही हवेतच विरली

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना ५ टक्क्यांनी कर्ज देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली आहे. अनेक दुकानदारांना नवीन मालाच्या खरेदीसाठी खिशात दमडी नाही. ते नव्याने उभारी घेणार तरी कशी? त्यामुळे ८ दिवसांत भरपाईची रक्कम व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. भरपाई जमा न केल्यास नाइलाजास्तव उपोषण छेडावे लागेल, असा इशाराही दिला आहे.

फोटो

चिपळूण व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले.