शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अनंत गितेंच्या वक्तव्याचा सरकारवर परिणाम हाेणार नाही : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

दापोली : राज्यामध्ये तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली असली तरीही स्थानिक पातळीवर तीन ...

दापोली : राज्यामध्ये तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली असली तरीही स्थानिक पातळीवर तीन पक्षांतील कार्यकर्त्यांची मने जुळण्यास विलंब होऊ शकतो; परंतु महाविकास आघाडी पक्षातील काही नेते आपली वैयक्तिक मते मांडून विरोधी पक्षांना आयते कोलीत देत आहेत. माजी खासदार अनंत गिते यांनी रायगडमध्ये केलेल्या वक्तव्याचा महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दापाेली येथील कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे शनिवारी आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सरकार टिकविण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर समन्वय साधला जात आहे, तसेच स्थानिकांची मते लक्षात घेऊन राज्यातील पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढल्या जातात का, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे भविष्यात तीन पक्ष एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतात. यापूर्वी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या युती व आघाडीच्या सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या होत्या. त्यामुळे येऊ घातलेल्या सर्व निवडणुका लढण्यासंदर्भात अजून तरी कोणताही निर्णय झालेला नाही, असे तटकरे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व काँग्रेस या पक्षाला सहकार्य करीत नसल्याची टीका होत आहे; परंतु या टीकेला आपण रायगडमध्ये जाऊनच उत्तर देऊ, असे त्यांनी सांगितले.

----------------------

सीआरझेडचे पुनर्सर्वेक्षण करणार

रत्नागिरी, रायगड दोन्ही जिल्हे पर्यटन जिल्हे आहेत. पर्यटन वाडीमध्ये सीआरझेडचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. श्रीवर्धनच्या धर्तीवर दापोली, गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारे विकसित केले जातील. राज्य सरकार सीआरझेडचा पुनर्सर्वेक्षण व नवीन कोस्टल मार्ग निर्माण करण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे. सीआरझेड शिथिल करण्यासाठी गुहागरच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये प्रयत्न सुरू आहेत, असे तटकरे यांनी सांगितले.

-----------------------

भाजप सरकारकडून जनतेची लूट

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत डॉलरचा रेट जास्त असूनही पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर नियंत्रणात ठेवण्यात यूपीए सरकारला यश आले होते; परंतु आता डॉलरचा दर घसरला असूनही केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेल गॅसवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. वारंवार संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करूनसुद्धा भाजपचे सरकार जनतेची लूट करीत आहे. हे दर कमी करण्याची मानसिकता सरकारची नाही, असे तटकरे म्हणाले.