शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

पहिल्या टप्प्याचा आंबा संपला तरी स्थानिकांना दर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:56 IST

Mango Ratnagiri- पहिल्या टप्प्यातील शेवटचा आंबा विक्रीसाठी मुंबई, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये पाठविण्यात आला. त्यामुळे मुंबई येथील वाशी मार्केटमधील प्रमाण कमी झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असला, तरी स्थानिकांना मात्र दर्शन दुर्लभ झाले आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्याचा आंबा संपला तरी स्थानिकांना दर्शन दुर्लभदुसऱ्या टप्प्यातील आंब्यासाठी करावी लागणार आठवडाभर प्रतीक्षा

रत्नागिरी : पहिल्या टप्प्यातील शेवटचा आंबा विक्रीसाठी मुंबई, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये पाठविण्यात आला. त्यामुळे मुंबई येथील वाशी मार्केटमधील प्रमाण कमी झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असला, तरी स्थानिकांना मात्र दर्शन दुर्लभ झाले आहे.गेल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमधील आवक मंदावली आहे. कोकणातून १७ ते १८ हजार पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. याशिवाय अन्य राज्यातून १० ते १२ हजार क्रेट आंबा विक्रीसाठी येत आहे. वाशी मार्केटमध्ये दोन ते साडेचार हजार रुपये पेटीला दर मिळत आहे. अन्य राज्यातील आंबा क्रेटमधून येत असून, २० किलोचे क्रेट विक्रीसाठी पाठविले जात आहेत. १२० ते १६० रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे.या वर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी रक्षण केल्याने त्याचा आंबा बाजारात आला. मात्र, या वर्षी थंडी जानेवारीपासून सुरू झाली, शिवाय थंडीचे प्रमाण कमी असल्याने फारसा मोहोर झाला नाही. त्यामुळे एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच अवकाळी पाऊस, उच्चतम तापमानाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले. गारपिटीच्या माऱ्यामुळे आंब्यावर काळे डाग पडून आंबा खराब झाला, शिवाय गेल्या आठवड्यात तापमानातील उच्चांकामुळे आंबा भाजला. एकूणच निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऋतुमानातील बदल व विविध संकटातून वाचलेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे.कोकणातून आंबा सुरू झाला असतानाच, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथील आंबाही बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. कोकणातील आंबा कमी असल्याने, काही विक्रेते कोकणच्या हापूस नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करून फसवणूक करीत आहेत. कोकणातील हापूसच्या तुलनेत अन्य राज्यांतील आंब्याचे दर कमी असल्यामुळे कमीतकमी खरेदी करून कोकण हापूस सांगून विक्री करून नफा कमवित आहेत. त्याचा परिणामही हापूसच्या विक्रीवर आणि हापूसच्या दरावरही होत आहे.अन्य राज्यातील आंबा विक्रीलाकर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. दररोज दहा ते बारा हजार क्रेट वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असून, १२० ते १६० रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे.स्थानिक मार्केटमध्ये उपलब्धतापहिल्या टप्प्यातील मोहोराचा आंबा संपला असून, दि. १० एप्रिलनंतर दुसऱ्या टप्यातील आंबा सुरू होणार आहे. एकूणच आंबा उत्पादन कमी असल्याने बहुतांश आंबा स्थानिक ऐवजी मुंबई, सुरत, अहमदाबाद येथे पाठविण्यात आला. त्यामुळे स्थानिक मार्केटमध्ये आंब्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ५०० ते १,००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. उन्हामुळे डाग पडलेला आंबा २०० ते २५० रुपये डझन रुपये दराने विकण्यात येत आहे.युरोप, आखाती प्रदेशात निर्यातवाशी मार्केट येथे विक्रीसाठी येणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के आंबा युरोप व आखाती प्रदेशात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. हवाई वाहतुकीपेक्षा जलवाहतूक स्वस्त असल्याने जलवाहतुकीद्वारे आंबा निर्यात सुरू आहे. 

पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असल्याने, दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू होण्यास अद्याप आठवडाभराचा अवधी आहे. या वर्षी आंबा उत्पादन कमी असून, त्या तुलनेत शेतकऱ्यांना दर उपलब्ध होत नाहीत. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यत होणारा खर्च लक्षात घेता, दर स्थिर राहणे अपेक्षित आहे.- प्रदीप सावंत,अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघ, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीMarketबाजार