शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

अलोरेचे निमशहरीपण धोक्यात

By admin | Updated: July 21, 2016 22:08 IST

‘कोयने’चे कार्यालय स्थलांतर : अन्य कार्यालयांचेही स्थलांतरण होणार

शिरगाव : चिपळूण तालुक्यात गेली ५० वर्षे निमशहरी गाव म्हणून परिचित असलेल्या अलोरेतून कोयना प्रकल्पाचे कार्यालयीन मनुष्यबळ कमी झाले आहे. उर्वरित कार्यालयांचेही स्थलांतरण होण्याची हालचाल सुरु असल्याने अनेक समाजघटक चिंतेत आहेत. जलविद्युत निर्मिती प्रकल्प शासकीय यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करुन कोकणात उभे राहू शकतात. किंबहुना आजवर बांधलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये तशी रचना ठेवून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. अशा प्रकल्पांमध्ये मनुष्यबळाचे व्यवस्थापनही होईल. या मनुष्यबळाच्या मुलभूत गरजांची पूर्तता करणारी शासकीय वसाहत, दुरुस्ती यंत्रणा तर विनाखर्च तयार आहे. कोयना ओझर्डे पायथा वीजगृह या ठिकाणीही विद्युत विभाग अभियंता, कर्मचारी, कामगार काम करु शकतात, असे शासनाला सुचविण्याचे काम सुरु झाले आहे. यातच भर म्हणून सर्वसमावेशक शासकीय आकृतीबंध दि. १ आॅक्टोबरपासून जाहीर झाल्यास अनावश्यक पदांवरील सर्वांना धक्का बसणार आहे. एकूणच २०-२५ वर्षाहून अधिक काळ कोयना संकुलातच बदली करुन राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत आता अस्थिरता निर्माण झाली आहे. १९६५साली टप्पा ३चे काम पूर्ण झाल्यानंतर पेढांबे माळरानावर शासन संपादीत जागा १९८३ सालापर्यंत पूर्ण मोकळी होती. तिथे टनेल खोदाई करणाऱ्या मोठ्या कंपन्यांतील कामगारांची पत्र्यांची चाळ सदृश निवासस्थाने होती. माजी आमदार राजाराम शिंदे यांनी नाममात्र दराने ९९ वर्षाचा करार करुन मंदार एज्युकेशन सोसायटीला ही जागा मिळवली. त्यांनी दूरदृष्टी ठेवून विविध प्रकारची शिक्षण सुविधा अलोरेनजिक उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्राच्या नकाशात कोयना प्रकल्पाबरोबर मंदार तंत्रनिकेतनमुळे अलोरे गावही दिसू लागले. कोयना प्रकल्प टप्पा चारमुळे व या तंत्रनिकेतनमधील मनुष्यबळ यामुळे गजबजलेल्या अलोरेत दोन्ही बाजूंनी काही प्रमाणात मरगळ दिसून आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया असल्याने, महाराष्ट्रात वाढलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयांमुळे क्षमता असूनही बाह्य विद्यार्थ्यांचा पूर्वीइतका ओढा राहिल्याचे दिसत नाही. दुसरीकडे जलसंपदा खात्याचे मनुष्यबळाचे व्यवस्थापन अवघ्या महाराष्ट्रात करण्याचे शासकीय धोरण आहे. अशा स्थितीत शासन संपादीत जागा वन खात्याकडे वर्ग करणार की पूर्वीप्रमाणेच एखाद्या बड्या व्यक्ती वा संस्थेला तयार सुविधा असलेली ही जागा देईल? हा भविष्याशी निगडीत प्रश्न सध्या चर्चेत आहे. ज्यांनी शहरात जावून अथवा अन्य नोकरीधंद्यातून विकास पाहिला. त्यांना आपल्या मूळ शेतजमिनीत काहीही करण्यामध्ये रस नाही. पण शेतीवरच अवलंबून असलेल्या अनेकांना सरकारने गरज नाही तर आमची जमीन आम्हाला द्यावी, असे वाटते.प्रकल्पग्रस्त दाखला परत घ्या, जमीन तरी द्या अन्यथा नोकरी द्या, अशी लाभापासून वंचित या प्रकल्पग्रस्तांची भावना आहे. आज स्थिती वेगळी आहे. टप्पा चारसाठी जागतिक बँकेचा हस्तक्षेप, वन खात्याचे नियम यामुळे एकहाती आजच्या शासनकर्त्यांना मोठ्या भूखंडाबाबत निर्णय घेता येणार नाही, अशी चर्चा आहे. (वार्ताहर)वैद्यकीय महाविद्यालय : ठेकेदार अडचणीतअलोरेसारख्या ठिकाणी मोठे वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या साऱ्या घटनांमध्ये छोटे ठेकेदार मात्र मोठ्या अडचणीत आले आहेत. अलोरे येथील महत्वाची कार्यालये इतरत्र नेण्याच्या हालचाली सुरू असल्याने अलोरे गाव केवळ नावापुरताच राहणार आहे.