शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकऱ्यांना भाजीपाला, कडधान्य बियाण्यांचे वाटप

By admin | Updated: November 18, 2015 00:15 IST

पी. एन. देशमुख : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा उपक्रम; भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामात मदत

रत्नागिरी : भाजीपाला व कडधान्य क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुुदानावर ११ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामामध्ये भाजीपाला व कडधान्याचे जास्तीत जास्त उत्पादन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात भाजीपाला व कडधान्य कमी प्रमाणात होत असल्याने तो घाटमाथ्यावरून येतो. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या या मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने तेथील शेतकरी सधन झाला आहे. आपल्या जिल्ह्यातही भाजीपाला व कडधान्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीनंतर रब्बी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य आदींचे पीक घेतल्यास स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला भाव मिळून त्यांच्या आर्थिक फायदाही होईल. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भाजीपाला व कडधान्यांचे बियाणे ५० टक्के अनुदानावर लवकरच वाटप करण्यात येणार आहे. हे बियाणे कोकण कृषी विद्यापीठाकडून उत्पादित केलेले असल्याची माहिती पी. एन. देशमुख यांनी दिले. (शहर वार्ताहर)५० टक्के अनुदानावर औषधे, कीटकनाशके पुरवणारराज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन विकास मंडळामार्फत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पीक संरक्षण औषधासाठी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पीक संरक्षण औषधाचा व कीटकनाशकाचा पुरवठा करण्यात येणार आहे. ८३६६ लीटर्स कीटकनाशके, औषधे ५० टक्के अनुदानावर वाटप करणार आहेत.शेतकऱ्यांना आवाहनचवळी, भेंडी, घेवडा, माठ, वाल, कुळीथ, मोहरी, काकडी, कारली, पडवळ, शिराळी, दुधी भोपळा, घोसाळी, मिरची, वांगी, मुळा, वाली आदिंचे बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. या बियाण्यांची शेतकऱ्यांनी उचल करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.