शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना भाजीपाला, कडधान्य बियाण्यांचे वाटप

By admin | Updated: November 18, 2015 00:15 IST

पी. एन. देशमुख : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा उपक्रम; भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामात मदत

रत्नागिरी : भाजीपाला व कडधान्य क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुुदानावर ११ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामामध्ये भाजीपाला व कडधान्याचे जास्तीत जास्त उत्पादन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात भाजीपाला व कडधान्य कमी प्रमाणात होत असल्याने तो घाटमाथ्यावरून येतो. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या या मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने तेथील शेतकरी सधन झाला आहे. आपल्या जिल्ह्यातही भाजीपाला व कडधान्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीनंतर रब्बी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य आदींचे पीक घेतल्यास स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला भाव मिळून त्यांच्या आर्थिक फायदाही होईल. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भाजीपाला व कडधान्यांचे बियाणे ५० टक्के अनुदानावर लवकरच वाटप करण्यात येणार आहे. हे बियाणे कोकण कृषी विद्यापीठाकडून उत्पादित केलेले असल्याची माहिती पी. एन. देशमुख यांनी दिले. (शहर वार्ताहर)५० टक्के अनुदानावर औषधे, कीटकनाशके पुरवणारराज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन विकास मंडळामार्फत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पीक संरक्षण औषधासाठी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पीक संरक्षण औषधाचा व कीटकनाशकाचा पुरवठा करण्यात येणार आहे. ८३६६ लीटर्स कीटकनाशके, औषधे ५० टक्के अनुदानावर वाटप करणार आहेत.शेतकऱ्यांना आवाहनचवळी, भेंडी, घेवडा, माठ, वाल, कुळीथ, मोहरी, काकडी, कारली, पडवळ, शिराळी, दुधी भोपळा, घोसाळी, मिरची, वांगी, मुळा, वाली आदिंचे बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. या बियाण्यांची शेतकऱ्यांनी उचल करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.