शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

युती, आघाडीबाबत साशंकता

By admin | Updated: October 2, 2016 00:15 IST

राजापूर नगर परिषद : राजकीय हालचालींना वेग; सध्या आघाडीची सत्ता

राजापूर : नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर राजापूरमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजापूर नगर परिषदेत असलेली सत्ता टिकवण्याची जबाबदारी असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होईल, अशी आता स्थिती दिसत असली तरी दुसरीकडे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांतील संघर्ष मिटेल व युती होईल, याबाबतही अंदाजे वर्तविणे मुश्कील झाले आहे. राज्यात ज्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये राजापूरचाही समावेश आहे. ब्रिटिशकालीन नगर परिषद असा उल्लेख असलेल्या या नगर परिषदेमध्ये एकूण सतरा नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यापूर्वी एकूण चार प्रभागांतून हे नगरसेवक निवडून दिले जात होते. मात्र, शासनाच्या नवीन धोरणानुसार आता एका प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. सात प्रभागांतून प्रत्येकी दोन असे चौदा आणि एका प्रभागातून तीन सदस्य अशी एकूण सतरा सदस्य संख्या असेल. राजापूर नगर परिषदेवर सध्या काँगे्रस - राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामध्ये काँग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचा एक असे अकरा सदस्य आहेत. राष्ट्रवादीचा एक सदस्य यापूर्वी सेनेत गेल्यामुळे सेनेची सदस्य संख्या एकने वाढून चार झाली आहे, तर भाजपची संख्या दोन आहे. स्वीकृत सदस्यांपैकी प्रत्येकी एक सदस्य काँग्रेस व भाजपचा आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असले, तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने अनेक इच्छुक नगराध्यक्षपद केंद्रस्थानी मानून वाटचाल करत आहेत. एकदा का नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले की, मगच खऱ्या अर्थाने राजकीय धुळवडीला सुरुवात होणार आहे. राजापूरची निवडणूक यावेळी तिरंगी होईल, अशी शक्यता आहे. दोन काँग्रेसदरम्यान आघाडी होईल, अशा दृष्टिने हालचाली सुरू आहेत. काँग्रेसच्या तुलनेत राजापुरात राष्ट्रवादी फारच कमजोर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ आघाडी करताना फारसे ताणून धरणार नाहीत, असे चित्र सध्या आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी जिल्ह्यात शिवसेनेशी युती करण्यास आधीच ठाम विरोध दर्शविला आहे. राजापुरात तर त्यांनी या विधानाचा वारंवार उच्चार करताना आपल्याला युती का नको, त्याची कारणेही दिली आहेत. शिवसेनेकडून मात्र अशी टोकाची भाषा वापरण्यात आलेली नाही. आमदार राजन साळवी यांनी तर युतीसाठी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे करत असल्याचे जाहीर केले होते. युतीला विरोध केल्याबद्दल राजापूर दौऱ्यावर येऊन गेलेले खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून युतीचा प्रस्ताव आल्यास आपण त्याचा विचार करू, असे विधानही केले होते. (प्रतिनिधी) युतीसाठी राजी नाही : आघाडीकडून निवडणुकीसाठी ‘फिल्डिंग’ फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहेत. जिल्ह्यात दोन काँग्रेसच्यावतीने आघाडी करून जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जाणार आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष यावेळी युतीसाठी राजी नसल्याचे दिसत आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना - भाजप यांच्यात युती होणार का? याबाबत कानोसा घेतला असता, दोन्ही पक्षांना युती नको असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेना - भाजप युती व दोन काँग्रेसची आघाडी होणार किंवा कसे याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.