शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

युती, आघाडीबाबत साशंकता

By admin | Updated: October 2, 2016 00:15 IST

राजापूर नगर परिषद : राजकीय हालचालींना वेग; सध्या आघाडीची सत्ता

राजापूर : नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर राजापूरमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजापूर नगर परिषदेत असलेली सत्ता टिकवण्याची जबाबदारी असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होईल, अशी आता स्थिती दिसत असली तरी दुसरीकडे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांतील संघर्ष मिटेल व युती होईल, याबाबतही अंदाजे वर्तविणे मुश्कील झाले आहे. राज्यात ज्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये राजापूरचाही समावेश आहे. ब्रिटिशकालीन नगर परिषद असा उल्लेख असलेल्या या नगर परिषदेमध्ये एकूण सतरा नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यापूर्वी एकूण चार प्रभागांतून हे नगरसेवक निवडून दिले जात होते. मात्र, शासनाच्या नवीन धोरणानुसार आता एका प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. सात प्रभागांतून प्रत्येकी दोन असे चौदा आणि एका प्रभागातून तीन सदस्य अशी एकूण सतरा सदस्य संख्या असेल. राजापूर नगर परिषदेवर सध्या काँगे्रस - राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामध्ये काँग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचा एक असे अकरा सदस्य आहेत. राष्ट्रवादीचा एक सदस्य यापूर्वी सेनेत गेल्यामुळे सेनेची सदस्य संख्या एकने वाढून चार झाली आहे, तर भाजपची संख्या दोन आहे. स्वीकृत सदस्यांपैकी प्रत्येकी एक सदस्य काँग्रेस व भाजपचा आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असले, तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने अनेक इच्छुक नगराध्यक्षपद केंद्रस्थानी मानून वाटचाल करत आहेत. एकदा का नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले की, मगच खऱ्या अर्थाने राजकीय धुळवडीला सुरुवात होणार आहे. राजापूरची निवडणूक यावेळी तिरंगी होईल, अशी शक्यता आहे. दोन काँग्रेसदरम्यान आघाडी होईल, अशा दृष्टिने हालचाली सुरू आहेत. काँग्रेसच्या तुलनेत राजापुरात राष्ट्रवादी फारच कमजोर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ आघाडी करताना फारसे ताणून धरणार नाहीत, असे चित्र सध्या आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी जिल्ह्यात शिवसेनेशी युती करण्यास आधीच ठाम विरोध दर्शविला आहे. राजापुरात तर त्यांनी या विधानाचा वारंवार उच्चार करताना आपल्याला युती का नको, त्याची कारणेही दिली आहेत. शिवसेनेकडून मात्र अशी टोकाची भाषा वापरण्यात आलेली नाही. आमदार राजन साळवी यांनी तर युतीसाठी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे करत असल्याचे जाहीर केले होते. युतीला विरोध केल्याबद्दल राजापूर दौऱ्यावर येऊन गेलेले खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून युतीचा प्रस्ताव आल्यास आपण त्याचा विचार करू, असे विधानही केले होते. (प्रतिनिधी) युतीसाठी राजी नाही : आघाडीकडून निवडणुकीसाठी ‘फिल्डिंग’ फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहेत. जिल्ह्यात दोन काँग्रेसच्यावतीने आघाडी करून जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जाणार आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष यावेळी युतीसाठी राजी नसल्याचे दिसत आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना - भाजप यांच्यात युती होणार का? याबाबत कानोसा घेतला असता, दोन्ही पक्षांना युती नको असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेना - भाजप युती व दोन काँग्रेसची आघाडी होणार किंवा कसे याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.