शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

अक्षय तृतीयेचा मुहूर्त पुन्हा हुकला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

मनाेज मुळ्ये लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून महत्त्वाचा असलेला अक्षय्य तृतीया सण गतवर्षाप्रमाणे यंदाही ...

मनाेज मुळ्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून महत्त्वाचा असलेला अक्षय्य तृतीया सण गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनामुळे काळवंडलेलाच ठरणार आहे. विविध प्रकारच्या मोठ्या खरेदीबरोबरच लग्नाच्या मुहूर्तासाठीही हा दिवस महत्त्वाचा असला तरी कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे यंदाही हा सण लग्नांच्या मुहूर्ताविनाच जाणार आहे.

सणांच्या परंपरेत अक्षय तृतीया हा खूप मानाचा सण मानला जातो. मोठ्या खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर विवाहही मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, गतवर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. गतवर्षी कोरोनाची सुरुवात असली तरी त्याबाबत भीती अधिक होती. त्यामुळे अक्षय तृतीया साजरीच झाली नाही. यंदा लोक कोरोनाला सरावले असले तरी आता दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असल्याने लाॅकडाऊन लागू आहे. त्यामुळे यंदाचा सणही काळवंडलेलाच आहे.

........................

मे महिन्यातील मुहूर्त

यंदाच्या मे महिन्यात तब्बल १६ दिवशी विवाहाचे ४० शुद्ध मुहूर्त आहेत; पण कोरोना आणि त्यामुळे झालेला लाॅकडाऊन यामुळे या मुहूर्तांवर कुठेही सनईचे सूर मात्र ऐकू येत नाहीत.

..................

सरकारी नियमांचा अडसर

गतवर्षापासून सरकारने विविध कार्यक्रमांवर बंदी आणताना लग्नसोहळ्यांनाही नियम लावले. विवाह सोहळ्याला केवळ ५० लोक उपस्थित राहण्याला परवानगी देण्यात आली. त्यात वेळेचे बंधन नव्हते. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात उपस्थिती २५ वर आली आहे आणि केवळ दोन तासांचाच वेळ देण्यात आला आहे. इतक्या कमी उपस्थितीत आणि कमी वेळेत लग्न केवळ ‘उरकावे’ लागत असल्याने ते टाळण्यावरच भर दिला जात आहे.

.......................

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

रत्नागिरी शहरात चार प्रमुख मंगल कार्यालये आहेत. त्याखेरीज काही ठिकाणी मैदानावर शामियाना उभारूनही लग्न समारंभ थाटात केला जातो.

लाॅकडाऊनमुळे मंगल कार्यालयांचे उत्पन्न पूर्ण थांबले आहे. कामगार इतरत्र जाऊ नयेत, यासाठी त्यांना कामावरून काढून टाकता येत नाही आणि उत्पन्न नसल्याने त्यांना पगार देण्यातही अडचणी अशा कात्रीत मंगल कार्यालयांचे मालक सापडले आहेत.

मंडप डेकोरेटर्स म्हणून काम करणाऱ्यांची स्थितीही बिकट झाली आहे. कामगारांना पगार देणेही आता जिकिरीचे झाले आहे.