शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:14 IST

कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरेसमन्वयक म्हणून डावखरे यांची दापोली कोकण कृषी विद्यापीठाला भेट

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु नसल्याने प्रशासकीय कामात काही अडथळे निर्माण होऊन, गतिमान प्रशासनाला थोडा ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. परंतु, कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी समन्वयक या नात्याने प्रयत्न केले जाईल.

कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेवर निरंजन डावखरे यांची निवड झाली आहे. कृषी विद्यापीठाचे समन्वयक म्हणून त्यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यावर लवकरच उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्याने त्यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन करीत आहेत आपण आजपर्यंत आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात एवढेच संशोधन विद्यापीठाचे असल्याचे बोलले जात होते. मात्र विद्यापीठाने याही पुढे जाऊन कोकणच्या लाल मातीत उत्कृष्ट स्टॉबेरी भाजीपाला विविध फळ पिकाचे संशोधन केले आहे. विद्यापीठाचे हे संशोधन कौतुकास्पद आहे. विद्यापीठाचे कामाला सरकारची जोड मिळावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कोकण कृषि विद्यापीठाला सरकारची सर्वतोपरी मद्त मिळावी कोकणातील शेतकºयांचा व कृषि क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, संशोधन, विस्तार या विविध उपक्रमाचा आढावा घेतला असता, काही बाबींना सरकारकडून आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.कोकण कृषि विद्यापीठाचे संशोधन आता केवळ कोकणापुरते मर्यादित राहु नये, त्याची व्याप्ती देश पातळीवर असायला हवी. कोकणातील भात, मासे, नारळ, सुपारी, आंबा, काजू या पुढे जावून संशोधन होने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.सरकाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील कृषि विद्यापीठे शिक्षण, संशोधन, विस्तार, या विविध स्तरावर काम सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी कृषि विद्यपिठाचे संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेRatnagiriरत्नागिरी