शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक

By मनोज मुळ्ये | Updated: January 28, 2024 15:44 IST

तिसऱ्या सूचीमधील नोंदीसाठी राज्यभर मेळावे घेणार

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, देवरुख : मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने आता राज्यातील गवळी समाजही आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. सद्यस्थितीत गवळी समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत असले तरी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे झाली आहे.

राज्यातील गवळी समाजाचा पहिला मेळावा रविवारी देवरुख येथे झाला. राज्यात गवळी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के आहे. गवळी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळते. पण केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी तसेच निवडणुकीतही याचा फायदा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये गवळी समाजाची नोंद व्हावी, अशी प्रमुख मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. गवळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, सध्या असलेले २.५ टक्के आरक्षण ३ टक्के करावे, तांडा वस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करावा, गवळी समाजातील लोककलांसाठी गवळी अकादमी स्थापन करण्यात यावी यासह अन्य काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.

या मेळाव्याला संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागातून मोठ्या संख्येने गवळी समाज बांधव एकत्र आले होते. असेच मेळावे राज्यभर घेतले जाणार आहेत. त्यातून समाजजागृती करुन नंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. या मेळाव्याला हिरामण गवळी, शंकरशेठ माटे, चंद्रकांत भोजने, तुषार खेतल, अजय बिरवटकर, अविनाश कांबळे, बबन बांडागळे, गंगाराम टोपरे, विठोबा खेतल, आत्माराम चाचे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षण