शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक

By मनोज मुळ्ये | Updated: January 28, 2024 15:44 IST

तिसऱ्या सूचीमधील नोंदीसाठी राज्यभर मेळावे घेणार

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, देवरुख : मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने आता राज्यातील गवळी समाजही आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. सद्यस्थितीत गवळी समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत असले तरी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे झाली आहे.

राज्यातील गवळी समाजाचा पहिला मेळावा रविवारी देवरुख येथे झाला. राज्यात गवळी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के आहे. गवळी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळते. पण केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी तसेच निवडणुकीतही याचा फायदा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये गवळी समाजाची नोंद व्हावी, अशी प्रमुख मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. गवळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, सध्या असलेले २.५ टक्के आरक्षण ३ टक्के करावे, तांडा वस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करावा, गवळी समाजातील लोककलांसाठी गवळी अकादमी स्थापन करण्यात यावी यासह अन्य काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.

या मेळाव्याला संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागातून मोठ्या संख्येने गवळी समाज बांधव एकत्र आले होते. असेच मेळावे राज्यभर घेतले जाणार आहेत. त्यातून समाजजागृती करुन नंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. या मेळाव्याला हिरामण गवळी, शंकरशेठ माटे, चंद्रकांत भोजने, तुषार खेतल, अजय बिरवटकर, अविनाश कांबळे, बबन बांडागळे, गंगाराम टोपरे, विठोबा खेतल, आत्माराम चाचे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षण