शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक

By मनोज मुळ्ये | Updated: January 28, 2024 15:44 IST

तिसऱ्या सूचीमधील नोंदीसाठी राज्यभर मेळावे घेणार

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, देवरुख : मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे आरक्षणाचा अध्यादेश निघाल्याने आता राज्यातील गवळी समाजही आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. सद्यस्थितीत गवळी समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत असले तरी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे झाली आहे.

राज्यातील गवळी समाजाचा पहिला मेळावा रविवारी देवरुख येथे झाला. राज्यात गवळी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के आहे. गवळी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळते. पण केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी तसेच निवडणुकीतही याचा फायदा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये गवळी समाजाची नोंद व्हावी, अशी प्रमुख मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. गवळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ, सध्या असलेले २.५ टक्के आरक्षण ३ टक्के करावे, तांडा वस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करावा, गवळी समाजातील लोककलांसाठी गवळी अकादमी स्थापन करण्यात यावी यासह अन्य काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.

या मेळाव्याला संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागातून मोठ्या संख्येने गवळी समाज बांधव एकत्र आले होते. असेच मेळावे राज्यभर घेतले जाणार आहेत. त्यातून समाजजागृती करुन नंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. या मेळाव्याला हिरामण गवळी, शंकरशेठ माटे, चंद्रकांत भोजने, तुषार खेतल, अजय बिरवटकर, अविनाश कांबळे, बबन बांडागळे, गंगाराम टोपरे, विठोबा खेतल, आत्माराम चाचे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षण