शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना घेतले दत्तक; पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली

By शोभना कांबळे | Updated: April 4, 2023 20:09 IST

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात.

रत्नागिरी : रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांनी जिल्ह्यातील २०३ क्षय रूग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली असून या रुग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात. परंतु ही मदत अत्यंत अल्प असून याखेरीज अन्नपुरवठा व इतर सुविधा व सहकार्य मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाची प्रकृती तत्परतेने पूर्ववत होण्यास मदत होईल. या अनुषंगाने केंद्रींय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनानुसार रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशनने जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना दत्तक घेतले आहे. या रूग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. या पोषण आहाराचा प्रारंभ मंगळवार, ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना देऊन करण्यात आला.

फिनोलेक्स कंपनी - मुकुल माधव फाऊंडेशनचे डायरेक्टर चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ.सूर्यवंशी, फिनोलेक्स कंपनीचे व्यवस्थापक सागर चिवटे, एच आर व्यवस्थापक संदीप गोगले, डॉ. अनुप करमरकर, अभिषेक साळवी तसेच क्षयरोग विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र, रत्नागिरी यांच्या मार्फत करण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी