शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना घेतले दत्तक; पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली

By शोभना कांबळे | Updated: April 4, 2023 20:09 IST

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात.

रत्नागिरी : रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांनी जिल्ह्यातील २०३ क्षय रूग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली असून या रुग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात. परंतु ही मदत अत्यंत अल्प असून याखेरीज अन्नपुरवठा व इतर सुविधा व सहकार्य मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाची प्रकृती तत्परतेने पूर्ववत होण्यास मदत होईल. या अनुषंगाने केंद्रींय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनानुसार रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशनने जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना दत्तक घेतले आहे. या रूग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. या पोषण आहाराचा प्रारंभ मंगळवार, ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना देऊन करण्यात आला.

फिनोलेक्स कंपनी - मुकुल माधव फाऊंडेशनचे डायरेक्टर चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ.सूर्यवंशी, फिनोलेक्स कंपनीचे व्यवस्थापक सागर चिवटे, एच आर व्यवस्थापक संदीप गोगले, डॉ. अनुप करमरकर, अभिषेक साळवी तसेच क्षयरोग विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र, रत्नागिरी यांच्या मार्फत करण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी