शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना घेतले दत्तक; पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली

By शोभना कांबळे | Updated: April 4, 2023 20:09 IST

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात.

रत्नागिरी : रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांनी जिल्ह्यातील २०३ क्षय रूग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली असून या रुग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात. परंतु ही मदत अत्यंत अल्प असून याखेरीज अन्नपुरवठा व इतर सुविधा व सहकार्य मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाची प्रकृती तत्परतेने पूर्ववत होण्यास मदत होईल. या अनुषंगाने केंद्रींय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनानुसार रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशनने जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना दत्तक घेतले आहे. या रूग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. या पोषण आहाराचा प्रारंभ मंगळवार, ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना देऊन करण्यात आला.

फिनोलेक्स कंपनी - मुकुल माधव फाऊंडेशनचे डायरेक्टर चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ.सूर्यवंशी, फिनोलेक्स कंपनीचे व्यवस्थापक सागर चिवटे, एच आर व्यवस्थापक संदीप गोगले, डॉ. अनुप करमरकर, अभिषेक साळवी तसेच क्षयरोग विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र, रत्नागिरी यांच्या मार्फत करण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी