शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

खरं स्वातंत्र्य अजून मिळवायचंय : मधुकर हिलम

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

आदिम कातकरी संघटना : चिपळुणात नाग्या महादू कातकरी पुण्यतिथी

चिपळूण : १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, रानावनात भटकणारा कातकरी बांधव आजही विविध शासकीय सेवा सुविधांपासून वंचित आहे. या समाजाचा सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. खरं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हायला हवे असे आवाहन आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर हिलम यांनी येथे आज गुरुवारी केले.शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहामध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची ८५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष प्रभाकर वाघे, मुख्य सचिव कमलाकर हिलम, सल्लागार शंकर वाघ, जिल्हाध्यक्ष विलास निकम, कार्याध्यक्ष सुरेश निकम, अ‍ॅड. विजय साठे, आदिवासी प्रकल्पाचे प्रतिनिधी एस.पी.चव्हाण, सचिव चंद्रकांत जाधव, शांता मुकणे, मंजुळा हिलम, शालिनी हिलम, तालुकाध्यक्ष शशिकांत हिलम, रमेश वाघ, नाना हिलम, नंदू पवार आदींसह हजारो कातकरी समाजबांधव उपस्थित होते. कातकरी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांना शाळेत जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. आश्रम शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठविले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळूनही हा समाज शासकीय सेवा सुविधांपासून वंचित जीवन जगत आहे. प्रत्येक वाडीवस्तीवर रस्ता व्हायला हवा. समाज मंदिरही उभी राहिली पाहिजेत. या समाजाचा सर्व्हे करण्यात न आल्यामुळे शासनाकडे निधी असूनही तो खर्च केला जात नाही. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. स्वातंत्र्याची खरी लढाई आपल्याला जिंंकायची आहे असेही हिलम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोहिते यांनी केले. (वार्ताहर)