शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

होम आयसोलेशनमध्ये असलेल्याबाबत कृती दल अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : पहिल्या कोरोना लाटेवेळी गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींवर ग्राम कृती दलाचे लक्ष असायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरावर शिक्के मारले ...

रत्नागिरी : पहिल्या कोरोना लाटेवेळी गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींवर ग्राम कृती दलाचे लक्ष असायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरावर शिक्के मारले जायचे. परंतु, दुसऱ्या लाटेत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. मात्र, कोरोना रुग्ण घरात आहेत, त्या घरावर सध्या कुठलीच खूण दिसून येत नाही, त्याचबरोबर आता नागरी अथवा ग्राम कृती दलांकडेही यादी नसल्याने गृह अलगीकरणात कोण कोण आहेत, त्यांची नावे लक्षात येत नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे नाहीत अशा व्यक्ती बाहेर बिनधास्त वावरत अधिक संसर्ग वाढवीत आहेत.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जलद गतीने वाढू लागला. त्यामुळे शासकीय रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण येऊ लागला. ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत, अशांमुळे रुग्णालयांतील खाटा अडून राहिल्याने गंभीर रुग्णांना खाटा मिळताना अडचणी येऊ लागल्या. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने ज्यांना कोरोनाची साैम्य लक्षणे आहेत किंवा अजिबातच लक्षणे नाहीत, अशा रुग्णांनी घरात राहूनच डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता असे रुग्ण घरात राहून उपचार घेत आहेत.

मात्र, काही रुग्णांच्या घरी अलगीकरणासाठी आवश्यक ती स्वच्छतागृह, स्वतंत्र खोलीची सोय नसल्याने अशा रुग्णांमुळे घरातील अन्य व्यक्तीही बाधित होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांनाही खीळ बसत आहे.

पहिल्या लाटेवेळी कोरोना रुग्ण कुठल्या कुठल्या भागातले आहेत, त्याची माहिती त्यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीला अथवा ग्रामकृती दल किंवा नागरी कृती दलाला दिली जात नसल्याचे निदर्शनाला येत आहे. त्यामुळे आपल्या भागातील कोरोना रुग्ण बाहेर कुठे जातो, याची कल्पनाही या कृती दलांना नसते. त्यामुळे लक्षणे नसलेल्या काही व्यक्तींचा सर्वत्र मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळेही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्यसेतूही कार्यरत नाही

पहिल्या कोरोना लाटेत कोरोनाबाधितांना आरोग्य सेतू हे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, सध्या हे ॲप दुसऱ्या लाटेत कालबाह्य झाल्यासारखे झाले आहे.

अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांची सुरक्षितता ऐरणीवर

शहरांमध्ये वन रूम किचनमध्येही काही साैम्य किंवा लक्षणे नसलेले रुग्ण राहत आहेत. अशांमुळे अन्य बाधित होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांच्या घरातील लोकांबरोबरच त्यांच्या लगतच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्यांपासूनही शेजारच्या फ्लॅटमध्ये रुग्ण असल्याचे लपविले जाते. कृती दलही यापासून अनभिज्ञ राहत असल्याने या दलाचे कुणी सदस्य किंवा आशा वर्करही फिरकत नाहीत. त्यामुळे अशा इमारतींमधील नागरिकांचे विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

निर्जंतुकीकरणाकडेही दुर्लक्ष

घरांमध्ये किंवा काही अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या रुग्णांबाबत माहिती नसल्याचे सांगत कृती दल हात झटकत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. अशा ठिकाणी एकापाठोपाठ अनेक रुग्ण वाढले असून, मृतांची संख्याही वाढली आहे.

तिसरी लाट कशी थोपविणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आधीच रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने आरोग्य विभाग घायकुतीला आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेतला नाही तर पुढे अधिक गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. आणि पुन्हा आरोग्य विभागावर अधिक ताण येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत आताच योग्यरीत्या कडक पावले उचलायला हवीत.

सुभाष थरवळ, अध्यक्ष, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ