शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

साखरपा : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या २५ वाहनचालकांवर साखरपा पोलीस ठाण्यातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून सहा हजार ...

साखरपा : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या २५ वाहनचालकांवर साखरपा पोलीस ठाण्यातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून सहा हजार रुपये तसेच विनामास्क फिरणाऱ्यांकडून २००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाहनचालकांनी धसका घेतला आहे.

संचारबंदी कडक

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील ग्रामपंचायतीने कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी साऱ्यांनीच लाॅकडाऊनचे नियम पाळण्याचा निर्णय गावाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

उकाड्याने केले हैराण

रत्नागिरी : सध्या तापमानाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबरच घामाच्या धारांनी नागरिकांना असह्य केले आहे. घशाला कोरड कायम पडलेली आहे. एप्रिल महिन्यातील उष्म्या त्रासदायक होत असून, सध्या कोरोनामुळे शीतपेये पितानाही नागरिकांना भीती वाटत आहे.

फिरत्या विक्रेत्यांचे नुकसान

रत्नागिरी : सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, फळ तसेच रसविक्रेते यांनाही आता रस्त्यावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच ठप्प झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सेतू कार्यालय बंद

देवरूख : कोरोनाच्या कारणामुळे येथील सेतू कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, सेतू बंद राहिल्याने त्याचा फटका महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. सध्या या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज भासत आहे; मात्र सेतू कार्यालय बंद राहिल्याने हे दाखले मिळविताना अडचणी येत आहेत.

कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे आता विविध कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. शासनाने ५० टक्के उपस्थितीचा आदेश काढला असला, तरी काही कार्यालयांमध्ये अजूनही १०० टक्के कर्मचारी येत आहेत. त्यामुळ संसर्गाची भीती कायम आहे.

विजेचा खेळ कायम

लांजा : उकाड्याने त्रस्त होत असतानाच रात्री-अपरात्री विजेचा पुरवठा अनियमित झाला आहे. उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागले असतानाच रात्री बऱ्याचदा वीज जात असल्याने पंख्याशिवाय काही काळ रहावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

कनेक्टिव्हीटीची समस्या कायम

राजापूर : शहर तसेच ग्रामीण भागात इंटरनेटच्या कनेक्टिव्हीटीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या सर्वच कामे ऑनलाईन सुरू आहेत, मात्र कनेक्टिव्हीटीमध्ये सतत येणाऱ्या व्यत्ययांमुळे अनेक अडचणी येत आहेत. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे.

उद्यानांमध्ये शुकशुकाट

रत्नागिरी : सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणांवरही बंदी आणली आहे. त्यामुळे आता उद्याने बंद आहेत. बालके सध्या घरात बसून कंटाळली असली, तरी त्यांना उद्यानात जाता येत नाही. मुलांअभावी या उद्यानात सध्या शुकशुकाट पसरला आहे.

पाण्याची टंचाई

मंडणगड : तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील जनतेला सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भागांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये आता टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.