शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

By admin | Updated: June 24, 2016 01:11 IST

रत्नागिरीतील प्रकार : सामाजिक संस्थांची जागरूकता

रत्नागिरी : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला वाम मार्गाला लावणाऱ्या संदीप प्रकाश यादव याला मुख्य न्यायदंडाधिकारी बी. डी. कुलकर्णी यांनी दोन वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर बाल न्याय कायदा व संरक्षण अधिनियमानुसार ४ महिने सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षाही त्याला सुनावण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड येथील एका आठ वर्षाच्या मुलाला त्याचे मद्यपी वडील रोज मारहाण करत असत. या रोजरोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या या मुलाने घरातून पळ काढत मुंबई गाठली. त्यावेळी संदीप प्रकाश यादव (रा. चापोली सरोदयवाडी देवरुख) याला तो सापडला. संदीपने त्या मुलाला आईवडिलांकडे सोडतो, असे सांगून मुंबईतून थेट रत्नागिरीत आणले. रत्नागिरीत रेल्वे स्टेशन येथे आणून त्याला मारहाण करून नशा करण्यासाठी जबरदस्ती केली. संदीप त्याला मारहाण करून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करत होता.एक दिवस चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक प्राची प्रकाश जाधव यांना हा मुलगा दिसला. त्यांनी याबाबतची माहिती बाल संरक्षण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांना दिली. त्यानुसार त्यांनी संदीप यादव याच्याविरोधात शहर पोलिस स्थानकात २६ आॅक्टोबर २०१५ला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक चित्रा मढवी करत होत्या. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावे ग्राह्य मानून मुख्य न्यायदंडाधिकारी बी. डी. कुलकर्णी यांनी संदीपला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एस. ए. फर्नांडिस यांनी काम पाहिले. (वार्ताहर)