शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चाचणी अहवालात अचूकता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

कोरोनाबाधित नसतानाही एका महिलेला बाधित ठरविण्यात आले. पुढील चार ते पाच तास निरोगी असताना तिला कोरोना रुग्णांसमवेत राहावे लागले. ...

कोरोनाबाधित नसतानाही एका महिलेला बाधित ठरविण्यात आले. पुढील चार ते पाच तास निरोगी असताना तिला कोरोना रुग्णांसमवेत राहावे लागले. यामुळे संबंधित रुग्णाला व कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला. एवढ्यावरच तो संपला नाही, तर काही तास कोरोना रुग्णालयात राहिल्याने संबंधित रुग्णाची पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील वैद्यकीय अहवाल येईपर्यंत रुग्णाच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे. वैद्यकीय अधिकारी मात्र याबाबत चाैकशी करणार असल्याचे सांगत आहेत. दिवसभरात हजारो तपासण्या कराव्या लागत असल्याने अशा चुका होऊ शकतात, अशी वक्तव्ये काही कर्मचारी करीत असतील तर हे मात्र हास्यास्पद आहे.

काेरोना होऊन बरे होणाऱ्यांची संख्या निश्चितच चांगली आहे. कोरोनामुळे निधन होणारे रुग्ण असले तरी धक्का पचवू न शकता आल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल देताना काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या रुग्णाच्या जिवाशी चुकीच्या अहवालामुळे खेळ होऊ शकतो. आरोग्य यंत्रणेवरील कामाच्या ताणाची सर्वसामान्य जनतेला कल्पना आहे. मात्र, अशा चुकाही अक्षम्य आहेत. कित्येक रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आल्याचा धक्का सहन न झाल्याने मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे डोळ्यात तेल घालूनच रुग्णांचे चाचणी अहवाल देणे गरजेचे आहे.

शासनाकडून लाॅकडाऊन घोषित केले असले तरी बेफिकिरीने वावरणाऱ्यांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महामार्गावरून येताना ई-पासची आवश्यकता आहे. मात्र, रेल्वेने येणाऱ्यांसाठी पासची सक्ती नाही. वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र एखाद्याने आणले असेल तर त्याची तपासणी होत नाही. होम क्वारंटाइनचा शिक्का मात्र मारला जातो. काही लोकांना चाैदा दिवस गृहविलगीकरणात राहणे शक्य नाही. त्यामुळे आलेली मंडळी होम क्वारंटाइन पूर्ण होईपर्यंत निघूनही जात आहे. यामुळे कोरोना संसर्गाला वेळ लागत नाही किंबहुना वाढलेल्या संख्येला हेही कारण पुरेसे आहे. गतवर्षी लाॅकडाऊन काळात कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाला शक्य झाले होते. यावर्षी कोरोना तपासणी केंद्र, उपचार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, कारणाशिवाय बाहेर पडून बेफिकिरीने वागणाऱ्यांमुळेच जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. यावर उचित कारवाई होणे गरजेचे आहे.