शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; एक ठार, ७ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 09:52 IST

महामार्ग पोलीस केंद्र असलेल्या कशेडी हद्दीमध्ये खवटी रेल्वे पुलाजवळ ही दुर्घटना घडली

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खेड येथे भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात कारचालक किशोर अनंत चव्हाण (वय-४८, रा. धामापूर, संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्ग पोलीस केंद्र असलेल्या कशेडी हद्दीमध्ये खवटी रेल्वे पुलाजवळ ही दुर्घटना घडली. रत्नागिरीवरून मुंबईकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या आयशर ट्रकला मागून धडकली. या अपघातामध्ये कारचालक किशोर चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.

अपघातग्रस्त वाहनातील अन्य ७ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये सनम संदीप चव्हाण (वय १२ वर्ष), हर्षदा किशोर चव्हाण (वय ४० वर्ष), संतोष आबाजी चव्हाण (वय ५५ वर्ष), रितिका केशव चव्हाण (वय १६ वर्ष), सार्थक किशोर चव्हाण (वय १४ वर्ष), स्मिता संतोष चव्हाण (वय ५० वर्ष), स्नेहा सुरज कर्वे (वय २८ वर्ष) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात झाल्याचे कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये बोडकर, समेल सुर्वे आदी पोलिसांचा समावेश होता. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात