शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

रत्नागिरीच्या हद्दवाढ कार्यवाहीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:41 IST

Ratnagiri Nagar Parishad - रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला वेग आला असून यासाठीचा झोन प्लॅन आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. हा आराखडा सहायक संचालकांकडून मंजूर होऊन आल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर चिपळूण, खेड आणि दापोली या शहरांच्या हद्दवाढीच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी  पत्रकार परिषदेत दिली. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या हद्दवाढ कार्यवाहीला वेगआराखडा मंजूर होऊन आल्यानंतर हरकती मागविणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला वेग आला असून यासाठीचा झोन प्लॅन आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. हा आराखडा सहायक संचालकांकडून मंजूर होऊन आल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर चिपळूण, खेड आणि दापोली या शहरांच्या हद्दवाढीच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी  पत्रकार परिषदेत दिली. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील हद्दवाढीचा प्रस्ताव दहा वर्षांपासून पुढे आला आहे. हद्दवाढ झाली तर लोकसंख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पार्किंग सुविधा, मोकळे एैसपैस रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधा चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे शहरीकरण झाल्याने वर्षानुवर्षे रखडलेला विकास होण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेला हद्दवाढीसंदर्भात २०१४-१५ साली जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात आला होता. त्यातून आता आराखडा तयार करण्यात आला असून तो अंतिम टप्प्यात आहे. यात शहरातील भाट्ये, तित्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तीन शहरांसाठी आराखड्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा नियोजनाचा निधी ४८५ कोटींपर्यंत वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत ८ रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. थिबा पॅलेस, टिळक स्मारक यांच्या दुरुस्तीसाठी परवानगी दिल्याचेही ते म्हणाले.सोमवारी लोकशाही दिनात ३१ अर्ज दाखल झाले असून त्यात अनेक तक्रारी अनधिकृत बांधकामाबाबत आहेत. ग्रामविकास आणि नगरविकास यांनी बांधकाम अधिकारांबाबत ग्रामपंचायत आणि प्रांत यांना दिलेल्या वेगवेगळ्या अधिकारामुळे संभ्रमाची अवस्था होती. २०१८ च्या नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार, कारवाईचे आदेश प्रांताकडे दिले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषदRatnagiriरत्नागिरी