शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

रेल्वे स्थानकात लिफ्टचा गैरवापर

By admin | Updated: December 11, 2014 23:55 IST

उद्देश धुळीला : सुरक्षारक्षकच नसल्याने प्रवाशांना मोकळे रान

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर ज्या कारणासाठी दोन वर्षांपूर्वी लिफ्ट उभारण्यात आली तो उद्देशच साफ धुळीला मिळविला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या लिफ्टसाठी कार्यरत असलेल्या रेल्वेच्या दोन सुरक्षारक्षकांनाही हटविण्यात आले आहे. त्यामुळे ही लिफ्ट म्हणजे ‘आओ जाओ लिफ्ट तुम्हारी’ अशी स्थिती निर्माण झाली असून, वरिष्ठ व्यक्ती, अपंग व गर्भवती महिलांना वालीच उरलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म हे खोल भागात असल्याने जिन्याने जा-ये करणे वृध्द, अपंग व गर्भवती महिलांना जिकिरीचे जात होते. त्यांची सोय व्हावी, त्यांना सुविधा मिळावी म्हणून खरेतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील भागातून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जाण्यासाठी काही लाख रुपये खर्च करून लिफ्ट उभारण्यात आली. पहिल्या दिड वर्षांच्या काळात या लिफ्टच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन शिफ्टमध्ये दोन सुरक्षारक्षक काम करीत होते. त्यावेळी वयोवृध्द, गर्भवती महिला व अपंगांना या लिफ्टमधून चांगली सेवा मिळत होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या लिफ्टला कोणी वालीच राहिलेला नाही. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा या उक्तीप्रमाणे आओ जाओ लिफ्ट तुम्हारी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या लिफ्टचा कोणीही वापर करू लागले आहे आणि विशेष म्हणजे यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने सामान्य प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.या लिफ्टचा वापर कोणीही कसाही करीत असून रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तसेच वडापाव व अन्य खाद्यविक्रेतेही या लिफ्टचा सातत्याने वापर करताना दिसून येत आहेत. बेबंद वापरामुळे ज्यांच्यासाठी ही सुविधा निर्माण केली त्यांना त्याचा लाभच होताना दिसत नाही. त्याबाबत प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)तो फलक तरी हटवावा...अपंग, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट असा मोठा फलक रेल्वे स्थानकावर लिफ्टजवळ लावण्यात आला आहे. त्यामुळे या लिफ्टचा वापर त्याच व्यक्तींसाठी व त्यांना मदत करणाऱ्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींसाठी करायला हवा, हे स्पष्ट आहे. मात्र त्याप्रमाणे या लिफ्टचा वापर होत नसून ही लिफ्ट आता सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासन काही दाद फिर्याद घेणार नसेल तर याबाबत लावण्यात आलेले फलक तरी हटवावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.