शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नारळाच्या काथ्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता : श्रीनिवास बिटलींगु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नारळाला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळ म्हणजे लक्ष्मीचेच रूप असून, वेगवेगळे उद्योग निर्माण करून रोजगार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नारळाला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळ म्हणजे लक्ष्मीचेच रूप असून, वेगवेगळे उद्योग निर्माण करून रोजगार निर्माण करण्याची क्षमता या झाडात आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाच्या क्वायर बोर्डाच्या उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास बिटलींगु यांनी दिली.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा समावेश असलेले क्वायर बोर्डाचे प्रादेशिक कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे असून, रत्नागिरी जिल्ह्यात क्वायरशी अर्थात नारळाच्या काथ्याशी निगडीत उद्योगांबाबत माहिती, उपलब्धता आणि संधीची माहिती घेण्यासाठी बिटलींगु रत्नागिरीत आले होते. त्यांच्यासमवेत क्वायर बोर्डाचे रत्नागिरीतील सदस्य बिपीन शिवलकर हेही उपस्थित होते. सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतील महिला, तरुण किंवा समूहांना उद्यमशील बनवून रोजगार निर्माण करून देण्यासाठी क्वायर बोर्ड कार्यक्रम आखत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये क्वायर अर्थात नारळाच्या काथ्याची उपयुक्तता काय आहे, त्यातून उद्योग कसा आणि कोणता निर्माण होऊ शकतो, याची माहिती इथल्या इच्छुकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी २ सप्टेंबरपासून रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि लांजा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बिटलींगु यांनी सांगितले.

नारळाच्या काथ्याचा वापर करून केवळ दोरखंड, पायपुसणे किंवा हॅन्डीक्राफ्टच्या वस्तूच बनवता येत नाहीत तर यापासून बनविण्यात येणारे कोकोपीठ खूप उपयुक्त आहे. त्यात पाणी साठवून ठवण्याची क्षमता असल्याने त्याचा शेतीसाठी खूप उपयोग होती. इमारत बांधण्यासाठी, नर्सरीसाठी याचा वापर होतो, अत्यंत कमी पैशात हे तयार करून नफा कमवता येतो. याशिवाय काथ्यापासून बनविण्यात येणारे भुवस्त्र बंधारे, रस्ते बांधकाम यासह जमिनीची धूप होण्यापासून वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी वापरता येत असल्याने त्याला मागणी असल्याचे श्रीनिवास बिटलींगु यांनी सांगितले.

आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या नारळाच्या झाडामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे, त्यामुळे घरात फेकून दिली जाणारी नारळाची सोडणे आपल्याला उद्योग निर्माण करून देऊ शकतात. यासाठीच रत्नागिरीत बिपीन शिवलकर यांच्या सहकार्याने याबाबत जनजागृती करून जी नारळाची सोडणे फुकट जात आहेत, त्यातून उद्योग निर्माण करण्यासाठी इथल्या लोकांना प्रवृत्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.