शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

नारळाच्या काथ्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता : श्रीनिवास बिटलींगु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नारळाला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळ म्हणजे लक्ष्मीचेच रूप असून, वेगवेगळे उद्योग निर्माण करून रोजगार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नारळाला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळ म्हणजे लक्ष्मीचेच रूप असून, वेगवेगळे उद्योग निर्माण करून रोजगार निर्माण करण्याची क्षमता या झाडात आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाच्या क्वायर बोर्डाच्या उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास बिटलींगु यांनी दिली.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा समावेश असलेले क्वायर बोर्डाचे प्रादेशिक कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे असून, रत्नागिरी जिल्ह्यात क्वायरशी अर्थात नारळाच्या काथ्याशी निगडीत उद्योगांबाबत माहिती, उपलब्धता आणि संधीची माहिती घेण्यासाठी बिटलींगु रत्नागिरीत आले होते. त्यांच्यासमवेत क्वायर बोर्डाचे रत्नागिरीतील सदस्य बिपीन शिवलकर हेही उपस्थित होते. सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतील महिला, तरुण किंवा समूहांना उद्यमशील बनवून रोजगार निर्माण करून देण्यासाठी क्वायर बोर्ड कार्यक्रम आखत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये क्वायर अर्थात नारळाच्या काथ्याची उपयुक्तता काय आहे, त्यातून उद्योग कसा आणि कोणता निर्माण होऊ शकतो, याची माहिती इथल्या इच्छुकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी २ सप्टेंबरपासून रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि लांजा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बिटलींगु यांनी सांगितले.

नारळाच्या काथ्याचा वापर करून केवळ दोरखंड, पायपुसणे किंवा हॅन्डीक्राफ्टच्या वस्तूच बनवता येत नाहीत तर यापासून बनविण्यात येणारे कोकोपीठ खूप उपयुक्त आहे. त्यात पाणी साठवून ठवण्याची क्षमता असल्याने त्याचा शेतीसाठी खूप उपयोग होती. इमारत बांधण्यासाठी, नर्सरीसाठी याचा वापर होतो, अत्यंत कमी पैशात हे तयार करून नफा कमवता येतो. याशिवाय काथ्यापासून बनविण्यात येणारे भुवस्त्र बंधारे, रस्ते बांधकाम यासह जमिनीची धूप होण्यापासून वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी वापरता येत असल्याने त्याला मागणी असल्याचे श्रीनिवास बिटलींगु यांनी सांगितले.

आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या नारळाच्या झाडामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे, त्यामुळे घरात फेकून दिली जाणारी नारळाची सोडणे आपल्याला उद्योग निर्माण करून देऊ शकतात. यासाठीच रत्नागिरीत बिपीन शिवलकर यांच्या सहकार्याने याबाबत जनजागृती करून जी नारळाची सोडणे फुकट जात आहेत, त्यातून उद्योग निर्माण करण्यासाठी इथल्या लोकांना प्रवृत्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.