शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

क्रीडा क्षेत्रात आरतीची राष्ट्रीय स्तरावर मजल

By admin | Updated: January 13, 2016 21:54 IST

पाच राष्ट्रीय खा-ेखो स्पर्धांबरोबरच पाच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेबरोबर खो - खो स्पर्धेत आरती अशोक कांबळे हिने भरारी घेतली आहे. पाच राष्ट्रीय खा-ेखो स्पर्धांबरोबरच पाच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने यश संपादन केले आहे. आजपर्यंत तिने चार सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदके मिळवली आहेत. आरती कांबळे सध्या एस. वाय. कला शाखेत शिकत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळ पुढे सुरू ठेवणार असल्याचे आरती हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरतीची आई गृहिणी असून, बाबा खासगी नोकरी करतात. मोठी बहीणही नोकरी करते. आरतीला लहान भाऊ असून, दहावीत शिकत आहे. आरतीच्या घरात कोणीही खेळाडू नाही. मात्र, रा. भा. शिर्के प्रशालेत शिकत असताना इयत्ता आठवीपासून शालेय संघातून खेळण्यास प्रारंभ केला. खो-खोबरोबरच अ‍ॅथलेटिक्समध्ये तिने यश मिळविले आहे. पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपद मिळाले. शिवाय अन्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांतही बक्षिसे मिळविली आहेत. खो-खोच्या शालेय संघातून खेळता खेळता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, अश्वमेध, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली. मुंबई, राजस्थान, नांदेड, फलटण, पुणे, जळगाव येथे झालेल्या स्पर्धांमध्ये घरच्या मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आरती सहभागी होऊ शकली. घरातून भक्कम पाठिंबा मिळत असल्यामुळेच आपण यश संपादन केले असल्याचे आरती हिने सांगितले. शिर्के प्रशालेत असताना क्रीडा प्रशिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चवंडे दररोज आरती व तिच्या संघाचा सराव घेत आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेत खेळत असताना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना, टीप्स देण्यात येतात. शिवाय विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचेही विद्यापीठस्तराबरोबर राज्य, राष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभत आहे. सकाळी दोन तास व सायंकाळी तीन तास न चुकता आरती सरावासाठी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर उपस्थित असते. स्पर्धा कोणतीही असो जिद्दीने स्पर्धेत उतरण्याबरोबर यश मिळविण्याचे तिचे ध्येय आहे. भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून शासकीय वर्ग - १चा अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे, ते आपण पूर्ण करणारच, असा निर्धार केला आहे. माझ्यासाठी माझे कुटुंबिय घेत असलेल्या कष्टाचे आपण सार्थक करणार आहोत, असेही आरती हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.