शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

क्रीडा क्षेत्रात आरतीची राष्ट्रीय स्तरावर मजल--यश रत्नकन्यांचे

By admin | Updated: January 15, 2016 00:23 IST

जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  -अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेबरोबर खो - खो स्पर्धेत आरती अशोक कांबळे हिने भरारी घेतली आहे. पाच राष्ट्रीय खा-ेखो स्पर्धांबरोबरच पाच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने यश संपादन केले आहे. आजपर्यंत तिने चार सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदके मिळवली आहेत. आरती कांबळे सध्या एस. वाय. कला शाखेत शिकत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळ पुढे सुरू ठेवणार असल्याचे आरती हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरतीची आई गृहिणी असून, बाबा खासगी नोकरी करतात. मोठी बहीणही नोकरी करते. आरतीला लहान भाऊ असून, दहावीत शिकत आहे. आरतीच्या घरात कोणीही खेळाडू नाही. मात्र, रा. भा. शिर्के प्रशालेत शिकत असताना इयत्ता आठवीपासून शालेय संघातून खेळण्यास प्रारंभ केला. खो-खोबरोबरच अ‍ॅथलेटिक्समध्ये तिने यश मिळविले आहे. पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपद मिळाले. शिवाय अन्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांतही बक्षिसे मिळविली आहेत. खो-खोच्या शालेय संघातून खेळता खेळता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, अश्वमेध, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली. मुंबई, राजस्थान, नांदेड, फलटण, पुणे, जळगाव येथे झालेल्या स्पर्धांमध्ये घरच्या मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आरती सहभागी होऊ शकली. घरातून भक्कम पाठिंबा मिळत असल्यामुळेच आपण यश संपादन केले असल्याचे आरती हिने सांगितले.शिर्के प्रशालेत असताना क्रीडा प्रशिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चवंडे दररोज आरती व तिच्या संघाचा सराव घेत आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेत खेळत असताना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना, टीप्स देण्यात येतात. शिवाय विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचेही विद्यापीठस्तराबरोबर राज्य, राष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभत आहे. सकाळी दोन तास व सायंकाळी तीन तास न चुकता आरती सरावासाठी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर उपस्थित असते. स्पर्धा कोणतीही असो जिद्दीने स्पर्धेत उतरण्याबरोबर यश मिळविण्याचे तिचे ध्येय आहे.भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून शासकीय वर्ग - १चा अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे, ते आपण पूर्ण करणारच, असा निर्धार केला आहे. माझ्यासाठी माझे कुटुंबिय घेत असलेल्या कष्टाचे आपण सार्थक करणार आहोत, असेही आरती हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.