शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आरे-वारे समुद्रात पाच पर्यटकांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:44 IST

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि ...

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि मॅथ्यू डिसुजा (१८, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) यांचा बुडून मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील डिसुजा आणि मास्टर कुटुुंब उन्हाळी सुटीनिमित्त पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. रविवारी दुपारी डिसुजा आणि मास्टर कुटुुंबातील सातजणांनी आरे-वारे समुद्र्रकिनारा गाठला. याठिकाणी मौजमजा करत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. केवळ रिटा डिसुजा (७०) या पाण्याच्या भीतीने पाण्यात उतरल्यानाहीत. त्यांनी काठावरच उभे राहणे पसंत केले.पाण्याला ओहोटी असल्याने सहाहीजण पाण्यात खेचले गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने सहाहीजण पाण्यात बुडू लागले. यावेळी आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी लिना मास्टर यांच्या हाताला किनाऱ्यानजीकचा दगड लागल्याने त्यांनी दगडाच्या मदतीने किनारा गाठत स्वत:चा जीव वाचवला. उर्वरित पाचजण वाहून गेले.स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम, ग्रामस्थ सागर शिवलकर, विवेक कनगुटकर, जीवन मयेकर, रूपेश वारेकर, महेश वारेकर यांनी समुद्रात बेपत्ता झालेल्या पाचजणांची शोध मोहीम सुरू केली. परंतु, पाण्याला ओहोटी असल्याने पाचहीजणांचे मृतदेह समुद्र्रातील दगडांमध्ये फसले होते. स्थानिक तरूणांनी मोठ्या जिकीरीने एकएक मृतदेह बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात बुडालेले पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.या दुर्घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह पोलीस कर्मचारीदेखील तत्काळ मदतीसाठी दाखल झाले होते.फाजील आत्मविश्वासदोन दिवस बरसलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला होता. डिसुजा कुटुंबीय समुद्रात उतरत असल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही हे सारेजण पाण्यात उतरले अन् ही दुर्घटना घडली. आरे-वारेतील स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मदतकार्यामुळे प्रशासनाने पाचहीजणांचे मृतदेह बाहेर काढले.