शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

आरे-वारे समुद्रात पाच पर्यटकांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:44 IST

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि ...

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि मॅथ्यू डिसुजा (१८, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) यांचा बुडून मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील डिसुजा आणि मास्टर कुटुुंब उन्हाळी सुटीनिमित्त पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. रविवारी दुपारी डिसुजा आणि मास्टर कुटुुंबातील सातजणांनी आरे-वारे समुद्र्रकिनारा गाठला. याठिकाणी मौजमजा करत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. केवळ रिटा डिसुजा (७०) या पाण्याच्या भीतीने पाण्यात उतरल्यानाहीत. त्यांनी काठावरच उभे राहणे पसंत केले.पाण्याला ओहोटी असल्याने सहाहीजण पाण्यात खेचले गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने सहाहीजण पाण्यात बुडू लागले. यावेळी आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी लिना मास्टर यांच्या हाताला किनाऱ्यानजीकचा दगड लागल्याने त्यांनी दगडाच्या मदतीने किनारा गाठत स्वत:चा जीव वाचवला. उर्वरित पाचजण वाहून गेले.स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम, ग्रामस्थ सागर शिवलकर, विवेक कनगुटकर, जीवन मयेकर, रूपेश वारेकर, महेश वारेकर यांनी समुद्रात बेपत्ता झालेल्या पाचजणांची शोध मोहीम सुरू केली. परंतु, पाण्याला ओहोटी असल्याने पाचहीजणांचे मृतदेह समुद्र्रातील दगडांमध्ये फसले होते. स्थानिक तरूणांनी मोठ्या जिकीरीने एकएक मृतदेह बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात बुडालेले पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.या दुर्घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह पोलीस कर्मचारीदेखील तत्काळ मदतीसाठी दाखल झाले होते.फाजील आत्मविश्वासदोन दिवस बरसलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला होता. डिसुजा कुटुंबीय समुद्रात उतरत असल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही हे सारेजण पाण्यात उतरले अन् ही दुर्घटना घडली. आरे-वारेतील स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मदतकार्यामुळे प्रशासनाने पाचहीजणांचे मृतदेह बाहेर काढले.