शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९३ तलाठ्यांना मिळणार नवा लॅपटाॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

जिल्हाभरातील ६५ मंडल अधिकाऱ्यांनाही गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा शोभना कांबळे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ...

जिल्हाभरातील ६५ मंडल अधिकाऱ्यांनाही गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा

शोभना कांबळे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण (लँड रेकार्ड माॅर्डनायझेशन) अंतर्गत तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या लॅपटाॅप खरेदीसाठी शासनाकडून निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९३ तलाठी आणि ६५ मंडल अधिकारी यांना या लॅपटाॅपचा लाभ मिळणार आहे.

मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया लॅंड रेकार्ड माॅर्डनायझेशन’ कार्यक्रमांतर्गत २०१७ साली तलाठ्यांना लॅपटाॅप देण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील एकूण ३९४ सजाच्या तलाठ्यांपैकी ३०१ जणांना लॅपटाॅप देण्यात आले. जिल्ह्यातील एकूण ६५ मंडल अधिकाऱ्यांपैकी एकालाही लॅपटाॅप मिळाला नाही. याआधी देण्यात आलेल्या लॅपटाॅपपैकी काही लॅपटाॅप आता नादुरुस्त स्वरूपात आहेत.

आता पुन्हा तलाठी आणि मंडल अधिकारी यांचे लॅपटाॅप क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडण्यासाठी लॅपटाॅपच्या खरेदीकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता ९३ तलाठी आणि ६५ मंडल अधिकारी यांना लॅपटाॅपचा लाभ मिळणार आहे.

सर्वाधिक सातबारा

राज्यात सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यात २० लाख ८४ हजार ८३ सातबारा आहेत. तर गावांची संख्या १५३६ आहे. मात्र, एवढ्या गावांसाठी केवळ ३९३ तलाठी काम करत आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा कारभार असल्याने महसुली कामे हाेताना अडचणीचे हाेत आहे.

पूर्वीच्या लॅपटाॅपचे काय?

‘शासनाने २०१७ साली जिल्ह्यातील ३०१ तलाठ्यांना लॅपटाॅप दिले होते. चार वर्ष होत आल्याने त्यापैकी काही लॅपटाॅप बंद झाले आहेत. मात्र, इतर अजुनही चांगले आहेत.

33333

रत्नागिरी जिल्ह्यात ६५ मंडल अधिकारी आहेत. अजुनही त्यांना लॅपटाॅप दिलेले नाहीत. आता शासनाने तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटाॅप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधी मंजूर केला असून टेंडरही निघाले आहे. त्यामुळे त्यांनाही लॅपटाॅप मिळतील.

शासनाने १०१७ साली ३०१ तलाठ्यांना लॅपटाॅप दिले. तर काहींना प्रिंटरही दिले आहेत. आता त्यापैकी काही बंद आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात नव्या १०३ सजांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे साधारणत: ११ मंडल नव्याने तयार झाली आहेत. तलाठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्वांनाच लॅपटाॅप मिळाल्यास ताण येणार नाही.

उमाकांत देशमुख, चिटणीस, रत्नागिरी - सिंधुदुर्ग तलाठी संघ

शासनाने तलाठ्यांना लॅपटाॅप दिल्याने सातबारा संगणकीकरणाचे काम वेगाने होण्यास मदत झाली. त्याचबरोबर इतरही कामे लॅपटाॅपवर करता येतात. हे लॅपटाॅप चांगल्या दर्जाचे आहेत. त्यामुळे यापैकी बिघाड झालेले लॅपटाॅप कमीच आहेत. शासनाने आता उरलेल्या तलाठ्यानांही लॅपटाॅप द्यावेत. त्यामुळे कामे अधिक गतीने होतील.

- संदेश घाग, सरपंच, मिरजोळे