शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

९७२ मुंबईकरांना आरोग्याचा डोस

By admin | Updated: September 11, 2014 00:11 IST

आरोग्य विभाग : दीड लाख प्रवाशांची तपासणी

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये गेल्या बारा दिवसांत जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य पथकांनी १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची तपासणी केली. त्यामध्ये ९७२ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असून, मलेरियाचे एकूण १७४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.गणेशोत्सवासाठी मुंबईहून बहुसंख्य चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, डेंग्यू या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात एस. टी., रेल्वे स्थानके आदी ठिकाणी आठ आरोग्य पथके तसेच महामार्गावर १७ ठिकाणी वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यात दि. २५ ते आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती.या आरोग्य पथकांकडून चाकरमान्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मलेरियाच्या १७४ संशयित रुग्णांचे रक्त नमुनेही घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ९७२ चाकरमान्यांवर पथकाकडून औषधोपचार करण्यात आले. मलेरियाच्या संशयित रुग्ण आणि औषधोपचार करण्यात आलेल्या रुग्णांचा घरचा पत्ता घेऊन आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांच्या गावच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्यास कळविण्यात आले होते़ त्यामुळे त्या चाकरमानी असलेल्या रुग्णाच्या राहत्या घरीही औषधोपचार करण्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली होती़ (शहर वार्ताहर)तपासणी केंद्रांचीही स्थापना१७४ मलेरियाचे संशयित रुग्ण सापडले.९७२ मुंबईकरांवर प्राथमिक उपचार.महामार्ग, रेल्वे-बस स्थानकावर तपासणी केंद्रांची स्थापना.१२ दिवस आरोग्य विभागाकडून तपासणी.डेंग्यू, काविळ, गॅस्ट्रो, स्वाइन फ्लूची शक्यता ध्यानी घेऊन आरोग्य विभागाचा उपक्रम.आरोग्य विभागाची सतर्कता.