शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

९७२ मुंबईकरांना आरोग्याचा डोस

By admin | Updated: September 11, 2014 00:11 IST

आरोग्य विभाग : दीड लाख प्रवाशांची तपासणी

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये गेल्या बारा दिवसांत जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य पथकांनी १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची तपासणी केली. त्यामध्ये ९७२ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असून, मलेरियाचे एकूण १७४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.गणेशोत्सवासाठी मुंबईहून बहुसंख्य चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, डेंग्यू या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात एस. टी., रेल्वे स्थानके आदी ठिकाणी आठ आरोग्य पथके तसेच महामार्गावर १७ ठिकाणी वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यात दि. २५ ते आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती.या आरोग्य पथकांकडून चाकरमान्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत १ लाख ४६ हजार ७४८ चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मलेरियाच्या १७४ संशयित रुग्णांचे रक्त नमुनेही घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ९७२ चाकरमान्यांवर पथकाकडून औषधोपचार करण्यात आले. मलेरियाच्या संशयित रुग्ण आणि औषधोपचार करण्यात आलेल्या रुग्णांचा घरचा पत्ता घेऊन आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांच्या गावच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्यास कळविण्यात आले होते़ त्यामुळे त्या चाकरमानी असलेल्या रुग्णाच्या राहत्या घरीही औषधोपचार करण्याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली होती़ (शहर वार्ताहर)तपासणी केंद्रांचीही स्थापना१७४ मलेरियाचे संशयित रुग्ण सापडले.९७२ मुंबईकरांवर प्राथमिक उपचार.महामार्ग, रेल्वे-बस स्थानकावर तपासणी केंद्रांची स्थापना.१२ दिवस आरोग्य विभागाकडून तपासणी.डेंग्यू, काविळ, गॅस्ट्रो, स्वाइन फ्लूची शक्यता ध्यानी घेऊन आरोग्य विभागाचा उपक्रम.आरोग्य विभागाची सतर्कता.