शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

जिल्ह्यात ८ उपकेंद्र बंद

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

महावितरणचा आडमुठेपणा : वीजपुरवठा नसल्याने ठप्प

रहिम दलाल - रत्नागिरी  -लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली ग्रामीण भागातील ८ उपकेंद्र वर्ष उलटले तरी वीजपुरवठा करण्यात आलेला नसल्याने ती बंद आहेत़ महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली़ मात्र, या उपकेंद्रांमधून गरजू, गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देता येत नसेल तर लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतींचा उपयोग काय, असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे़ रुग्णांना शासनाकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली़ त्याचा हजारो रुग्णांनी फायदा करुन घेतला आहे़ तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातर्गतही शासनाने रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे़ शासन दरवर्षी गरजू व गरिबांसाठीच्या आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ मात्र, त्यासाठी लागणाऱ्या विजेसारख्या महत्त्वाच्या बाबीचा पुरवठा करण्यास महावितरणकडून चालढकल केली जात केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ३६८ उपकेंद्र आहेत़ याद्वारे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना दररोज उपचार दिले जात आहेत़ रुग्णांना चांगली सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रही सुस्थितीत असणे आवश्यक आहेत़ त्यासाठी जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन ८ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ या उपकेंद्रांच्या इमारती पूर्ण होऊन सुमारे दीड वर्ष उलटले तरी त्यांना वीज व पाणी पुरवठा देण्यात आलेला नाही़ महावितरणकडे विद्युत पुरवठ्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रस्ताव दाखल केला आहे़ मात्र, महावितरणकडून वर्ष उलटले तरी त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने अद्याप वीजजोडणी केलेली नाही़ त्यामुळे ही उपकेंद्र वीज आणि पाणी पुरवठा नसल्याने आजही बंद आहेत़ त्यामुळे महावितरण कंपनी वीज जोडणी आणि ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे या उपकेंद्राबाबत आरोग्य विभागाकडून महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आठपैकी एकाही उपकेंद्राला वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. वीजजोडणीच नसल्याने नव्याने बांधलेल्या या इमारतीत यंत्रणाही बसवलेली नाही. त्यामुळे नवीन असूनही इमारती ओस पडल्या आहेत. जनतेच्या आरोग्याबाबत महावितरणला किती कळवळा आहे, हेच यावरून दिसून येते.नवीन उपकेंद्र खालीलप्रमाणे आहेत़ तालुकाबंद उपकेंद्र संगमेश्वर बोंड्ये, कुचांबेचिपळूणकुंभार्लीखेडसवणस, गुणदेलांजाव्हेळराजापूरहसोळ, भूउपकेंद्रांना पाणी पुरवठ्याची अवश्यकताजिल्हा परिषद आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करुन आठ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ ही उपकेंद्रे सुरु करण्यासाठी वीज पुरवठ्यासह पाणी पुरवठ्याची सोय असणे आवश्यक आहे़ मात्र, वीजपुरवठा तर नाहीच, शिवाय ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठाही करण्यात आलेला नाही़ त्या उपकेंद्रांच्या नवीन इमारती केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ मुलभूत गरजांची व्यवस्था कधी होणार? असा सवाल होत आहे.