शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्ह्यात ८ उपकेंद्र बंद

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

महावितरणचा आडमुठेपणा : वीजपुरवठा नसल्याने ठप्प

रहिम दलाल - रत्नागिरी  -लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली ग्रामीण भागातील ८ उपकेंद्र वर्ष उलटले तरी वीजपुरवठा करण्यात आलेला नसल्याने ती बंद आहेत़ महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली़ मात्र, या उपकेंद्रांमधून गरजू, गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देता येत नसेल तर लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतींचा उपयोग काय, असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे़ रुग्णांना शासनाकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, यासाठी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली़ त्याचा हजारो रुग्णांनी फायदा करुन घेतला आहे़ तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातर्गतही शासनाने रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे़ शासन दरवर्षी गरजू व गरिबांसाठीच्या आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ मात्र, त्यासाठी लागणाऱ्या विजेसारख्या महत्त्वाच्या बाबीचा पुरवठा करण्यास महावितरणकडून चालढकल केली जात केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ३६८ उपकेंद्र आहेत़ याद्वारे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना दररोज उपचार दिले जात आहेत़ रुग्णांना चांगली सेवा देण्यात यावी, यासाठी उपकेंद्रही सुस्थितीत असणे आवश्यक आहेत़ त्यासाठी जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन ८ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ या उपकेंद्रांच्या इमारती पूर्ण होऊन सुमारे दीड वर्ष उलटले तरी त्यांना वीज व पाणी पुरवठा देण्यात आलेला नाही़ महावितरणकडे विद्युत पुरवठ्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रस्ताव दाखल केला आहे़ मात्र, महावितरणकडून वर्ष उलटले तरी त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने अद्याप वीजजोडणी केलेली नाही़ त्यामुळे ही उपकेंद्र वीज आणि पाणी पुरवठा नसल्याने आजही बंद आहेत़ त्यामुळे महावितरण कंपनी वीज जोडणी आणि ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे या उपकेंद्राबाबत आरोग्य विभागाकडून महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आठपैकी एकाही उपकेंद्राला वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. वीजजोडणीच नसल्याने नव्याने बांधलेल्या या इमारतीत यंत्रणाही बसवलेली नाही. त्यामुळे नवीन असूनही इमारती ओस पडल्या आहेत. जनतेच्या आरोग्याबाबत महावितरणला किती कळवळा आहे, हेच यावरून दिसून येते.नवीन उपकेंद्र खालीलप्रमाणे आहेत़ तालुकाबंद उपकेंद्र संगमेश्वर बोंड्ये, कुचांबेचिपळूणकुंभार्लीखेडसवणस, गुणदेलांजाव्हेळराजापूरहसोळ, भूउपकेंद्रांना पाणी पुरवठ्याची अवश्यकताजिल्हा परिषद आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करुन आठ उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केले़ ही उपकेंद्रे सुरु करण्यासाठी वीज पुरवठ्यासह पाणी पुरवठ्याची सोय असणे आवश्यक आहे़ मात्र, वीजपुरवठा तर नाहीच, शिवाय ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठाही करण्यात आलेला नाही़ त्या उपकेंद्रांच्या नवीन इमारती केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ मुलभूत गरजांची व्यवस्था कधी होणार? असा सवाल होत आहे.