शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

कशेडी घाटात होणार आठ कि.मी.चा बोगदा

By admin | Updated: January 10, 2015 00:23 IST

जिल्हाधिकारी आणि ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसा आदेश दिल्याची माहिती वायकर यांनी दिली

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीकरिता कशेडी घाटादरम्यान ८ किलोमीटरचा नवा बोगदा तयार करणार असून, तसा आदेश देण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली.वायकर हे प्रथमच खेडमध्ये आल्यामुळे खेड तालुका शिवसेनेच्यावतीने येथील सभापती निवासस्थानामध्ये त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेंतर्गत तालुक्यात असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वायकर यांनी पक्षहिताच्या दृष्टीने एकत्र येण्याचे आवाहन केले. वायकर यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणदरम्यान कशेडी घाटामध्ये ८ किलोमीटर अंतराचा नवीन बोगदा तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. जिल्हाधिकारी आणि ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसा आदेश दिल्याची माहिती वायकर यांनी दिली. येथील विकासकामांसदर्भात आजपासूनच आपण लक्ष घातले असून, कामे विनाविलंब मार्गस्थ होण्याच्या दृष्टीने तीन महिन्यांतून एकदा खेडमध्ये जनता दरबार भरविणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, महिला आघाडीप्रमुख महाडिक, खेडचे पहिले शाखाप्रमुख सुधा बुटाला, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, सभापती चंद्रकांत कदम, जिल्हा परिषद सभापती अरुणा आंब्रे उपस्थित होते.(प्रतिनिधी)