शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

गणपतीपुळे विकासासाठी ७० कोटींचा आराखडा

By admin | Updated: February 2, 2016 23:49 IST

अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती. वित्त व नियोजनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ (सर्वसाधारण)ची राज्यस्तरीय बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आदी उपस्थित होते. या बैठकीत वायकर यांनी विविध गोष्टींची मागणी केली. यात जिल्ह्यामध्ये १०५९ साकव असून, सद्य:स्थितीत ५९७ साकव नादुरुस्त आहेत. त्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याने आवश्यक निधी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार नादुरुस्त, तसेच प्रस्तावित साकवांची पाहणी करून निधी देण्यात येईल, असे आश्वासन वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांना दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी थिबा पॅलेस ते भाट्ये बीच रोपवे, परशुराम ते गोवळकोट किल्ला रोपवे, शासकीय रोपवाटिकांची अत्याधुनिक नर्सरी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, स्टार, शौचालये, आदी विविध मागण्याही पालकमंत्री वायकर यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी) ‘‘लोकमत’च्या वृत्ताची दखल अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.