शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

गणपतीपुळे विकासासाठी ७० कोटींचा आराखडा

By admin | Updated: February 2, 2016 23:49 IST

अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती. वित्त व नियोजनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ (सर्वसाधारण)ची राज्यस्तरीय बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आदी उपस्थित होते. या बैठकीत वायकर यांनी विविध गोष्टींची मागणी केली. यात जिल्ह्यामध्ये १०५९ साकव असून, सद्य:स्थितीत ५९७ साकव नादुरुस्त आहेत. त्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याने आवश्यक निधी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार नादुरुस्त, तसेच प्रस्तावित साकवांची पाहणी करून निधी देण्यात येईल, असे आश्वासन वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांना दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी थिबा पॅलेस ते भाट्ये बीच रोपवे, परशुराम ते गोवळकोट किल्ला रोपवे, शासकीय रोपवाटिकांची अत्याधुनिक नर्सरी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, स्टार, शौचालये, आदी विविध मागण्याही पालकमंत्री वायकर यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी) ‘‘लोकमत’च्या वृत्ताची दखल अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.