शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

गणपतीपुळे विकासासाठी ७० कोटींचा आराखडा

By admin | Updated: February 2, 2016 23:49 IST

अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती. वित्त व नियोजनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ (सर्वसाधारण)ची राज्यस्तरीय बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आदी उपस्थित होते. या बैठकीत वायकर यांनी विविध गोष्टींची मागणी केली. यात जिल्ह्यामध्ये १०५९ साकव असून, सद्य:स्थितीत ५९७ साकव नादुरुस्त आहेत. त्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याने आवश्यक निधी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार नादुरुस्त, तसेच प्रस्तावित साकवांची पाहणी करून निधी देण्यात येईल, असे आश्वासन वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांना दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी थिबा पॅलेस ते भाट्ये बीच रोपवे, परशुराम ते गोवळकोट किल्ला रोपवे, शासकीय रोपवाटिकांची अत्याधुनिक नर्सरी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, स्टार, शौचालये, आदी विविध मागण्याही पालकमंत्री वायकर यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी) ‘‘लोकमत’च्या वृत्ताची दखल अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. अर्थमंत्र्यांनी या बैठकीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद (ता. दापोली) या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अर्थमंंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ आणि २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी ‘लोकमत’ने रमार्इंच्या गावातील गैरसोयी आणि तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांचा ऊहापोह केला होता. त्याची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली होती. आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.