शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे लागवडीची ६८ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे उरकल्याने, या वर्षी भात लागवडीच्या कामाला लवकर प्रारंभ झाला. सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे उरकल्याने, या वर्षी भात लागवडीच्या कामाला लवकर प्रारंभ झाला. सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत आहे. मात्र, मध्येच पावसाने दडी मारली होती, परंतु पुन्हा पावसाने दमदार बरसण्यास प्रारंभ केला असल्याने, रखडलेल्या लागवडीच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ६८ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.

रखडलेल्या पावसामुळे भात रोपे वाळू लागली होती. मात्र, पावसामुळे भात रोपांना संजीवनी प्राप्त झाली आहे. लागवडीची कामे मात्र अंतिम टप्प्यात सुरू आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना, ५५ हजार ५४०.३० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. नागली पीक १४ हजार ३९३.८७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत असताना, आतापर्यंत ६८५४.७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तूर लागवड ७१८.५० हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना, ६३ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. इतर पिके १७९०.८७ लागवड करण्यात येत असताना, ७१४.१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात लागवडीच्या कामांची लगबग सुरू आहे. पारंपरिक नांगर, तसेच पॉवर टिलरद्वारे नांगरणी केली जात आहे. पॉवर टिलरमुळे नांगरणीचे काम कमी वेळेत व कमी श्रमात पूर्ण होत आहे. मजुरांची उपलब्धता होत नसल्यामुळे सामूहिक पद्धतीने लागवडीची कामे उरकण्यात येत आहे. गेल्या आठवडयापासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने कामाचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात हळवे, निमगरवे व गरवे भात लागवड करण्यात येत असून, येत्या आठवडाभरात भात लागवडीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी सुधारित व संकरीत बियाण्यांचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात भातासह नागली, तूर, इतर पिकांची लागवड सुरू असून, पावसामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाचला आहे.