शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

पावसामुळे लागवडीची ६८ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे उरकल्याने, या वर्षी भात लागवडीच्या कामाला लवकर प्रारंभ झाला. सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे उरकल्याने, या वर्षी भात लागवडीच्या कामाला लवकर प्रारंभ झाला. सुरुवातीपासून चांगला पाऊस बरसत आहे. मात्र, मध्येच पावसाने दडी मारली होती, परंतु पुन्हा पावसाने दमदार बरसण्यास प्रारंभ केला असल्याने, रखडलेल्या लागवडीच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ६८ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.

रखडलेल्या पावसामुळे भात रोपे वाळू लागली होती. मात्र, पावसामुळे भात रोपांना संजीवनी प्राप्त झाली आहे. लागवडीची कामे मात्र अंतिम टप्प्यात सुरू आहे. जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना, ५५ हजार ५४०.३० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. नागली पीक १४ हजार ३९३.८७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत असताना, आतापर्यंत ६८५४.७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तूर लागवड ७१८.५० हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना, ६३ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. इतर पिके १७९०.८७ लागवड करण्यात येत असताना, ७१४.१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात लागवडीच्या कामांची लगबग सुरू आहे. पारंपरिक नांगर, तसेच पॉवर टिलरद्वारे नांगरणी केली जात आहे. पॉवर टिलरमुळे नांगरणीचे काम कमी वेळेत व कमी श्रमात पूर्ण होत आहे. मजुरांची उपलब्धता होत नसल्यामुळे सामूहिक पद्धतीने लागवडीची कामे उरकण्यात येत आहे. गेल्या आठवडयापासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने कामाचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात हळवे, निमगरवे व गरवे भात लागवड करण्यात येत असून, येत्या आठवडाभरात भात लागवडीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी सुधारित व संकरीत बियाण्यांचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात भातासह नागली, तूर, इतर पिकांची लागवड सुरू असून, पावसामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाचला आहे.